शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

राज्यातील २६ जिल्ह्यात राबविणार नगर वन उद्यान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:50 IST

राज्यातील शाळांमध्ये केंद्राच्या सहयोगाने शाळा रोपवाटिका योजनाही राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची योजना शाळा रोपवाटिका योजनाही राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगर वन उद्यान ही केंद्र शासनच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना देशातील २०० शहरात राबविण्यात येणार आहे. राज्यातील २६ शहरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. देशातील सर्व राज्यातील वनमंत्र्यांची आढावा बैठक दृकश्राव्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी घेतली. त्यात हे जाहीर करण्यात आले. यासोबतच राज्यातील शाळांमध्ये केंद्राच्या सहयोगाने शाळा रोपवाटिका योजनाही राबविण्यात येणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राकडून वनमंत्री संजय राठोड उपस्थित होते.नगर वन उद्यान ही योजना २५ ते १०० हेक्टर क्षेत्रावर शहरात व शहारालगत असलेल्या वनक्षेत्रावर राबविली जाणार आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ८० टक्के व राज्य सरकारचा वाटा २० टक्के राहणार आहे. एका शहराला वन उद्यानासाठी कमाल दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, तो संरक्षक भिंत व वृक्षलागवडीसाठी वापरला जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि वृक्षाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळा रोपवाटिका योजना राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामार्फत शाळेत एक शाळा रोपवाटिका व त्यात एक हजार रोपे निर्माण केली जाणार आहेत. या योजनेसाठी सरासरी ४० ते ५० हजार रुपये अनुदान एका शाळेला मिळणार आहे.२६ पैकी ११ महानगरपालिकांचे नगर वन उद्यान प्रस्ताव व ४३ शाळांचे शाळा रोपवाटिका योजना प्रस्ताव केंद्राकडे सादर केले असल्याची माहिती राठोड यांनी बैठकीत दिली. नगर वन उद्यान योजनेत महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांनासुद्धा सहभागी करून घेण्यात येणार आहे. शाळा रोपवाटिका योजनेत राज्यातील १५० शाळा समाविष्ट करण्यात येणार आहेत. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त जिल्हा नियोजन निधीमधून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शाळा रोपवाटिका योजना राबविण्याच्या सूचना लवकरच दिल्या जाणार आहेत.

५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट राज्यात पूर्ण करण्यात आले असून, संगोपन व संवर्धन करण्याबाबत विशेष लक्ष देणार असल्याचे राठोड यांनी बैठकीत सांगितले. वन संरक्षण अधिनियम १९८० मधील तरतुदीला बाधा न आणता राखीव वन क्षेत्रातील तलावांमधील गाळ काढणे व शेतीत तो गाळ पसरविण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रियो व अरुणाचल प्रदेश व गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला. या बैठकीसाठी देशातून ३० राज्यातील वनमंत्री उपस्थित होते. राज्याचे प्रधान सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख रामबाबू उपस्थित होते.

 

टॅग्स :forestजंगलSchoolशाळा