शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:31 IST

शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत मोहीम : लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.बचतभवन येथे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत नदी सफाई अभियानाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस आमदार प्रा. अनिल सोले, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र्र कुकरेजा, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त रवींद्र्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मुख्य अभियंता मनोज तालेवार आदी उपस्थित होते.संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत शहरातील तीन प्रमुख नद्यांचे स्वच्छता अभियान मे व जून या महिन्यात राबविण्यात येत असून या अभियानासाठी विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजक व सीएसआर व निधीमधून या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी अतिवृष्टी व पूरामुळे नद्यांचा प्रवाह बंद होत असल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांची सफाई करण्यात येणार असून पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीने नद्यामधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पोकलॅण्ड व जेसीपी सारख्या यंत्राची आवश्यकता आहे. यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.नद्यांच्या सफाई व खोलीकरणाचे काम मागील वर्षीसुध्दा करण्यात आले आहे. यामध्ये नाग नदीची लांबी १८ किलोमीटीर, पिवळी नदी १७.५ कि.मी. तर पोरा नदीची लांबी १२ कि.मी. आहे. मागील वर्षी या नद्यांमधून १ लक्ष ३३ हजार मेट्रिक टन गाळ व कचरा ४५० टिप्पर काढण्यात आले. यासाठी १० पोकलॅण्डचा वापर करण्यात आला असून यासाठी ५० हजार लिटर डिझेलचा वापर झाला आहे. यावर्षी सुध्दा १५ पोकलॅण्डची आवश्यकता असून तिन्ही नद्यातील गाळ काढणे, तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे अभियान मागील चार वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीnagpurनागपूर