शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाजार समितीतून हरभऱ्याचे चक्क ३०० कट्टे गायब; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 12:53 IST

बाजार समितीच्या आवारातून हरभऱ्याचे ३०० कट्टे गायब झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवाय, भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनाफेड हरभरा खरेदी प्रकरण

शरद मिरे

भिवापूर (नागपूर) : बाजार समितीच्या यार्डात नाफेडची परवानगी नसताना जगाचा पाेशिंदा या फार्मर प्राेड्युसर कंपनीने नाफेडच्या नावावर हरभऱ्याची खरेदी केली. प्रकरण उघड हाेताच ते दडपण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच बाजार समितीच्या आवारातून हरभऱ्याचे ३०० कट्टे गायब झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवाय, भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही फार्मर प्राेड्युसर कंपनी भंडारा जिल्ह्यातील असून, कंपनीचे संचालक त्र्यंबक गिरीपुंजे, रा. माेखारा, जिल्हा भंडारा यांनी भिवापूर येथील एका व्यापाऱ्याच्या परवान्यावर स्थानिक अडतीयाकडून ५०० क्विंटल हरभरा खरेदी केला होता. त्यातील ४०० क्विंटल हरभऱ्याचे प्रत्येकी ५० किलोप्रमाणे ८०० पाेती (कट्टे) तयार करून त्यावर नाफेडचा स्टॅम्प मारला हाेता. यातील ४०० कट्टे एमएच-३४/एम-६४४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरले हाेते. उर्वरित ४०० कट्टे एमएच-३३/बीजी-८०६४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरणे सुरू असताना प्रकरण उघड झाले. त्यामुळे ते ४०० कट्टे बाजार समितीच्या आवारातील ओट्यावर पडून होते. या कट्ट्यांची शनिवारी (दि. २१) पाहणी केली असता, यातील २५० कट्टे गायब आढळून आले. तेथील ताडपत्री खाली केवळ ५० कट्टे हाेते. दरम्यान, रविवारी (दि. २२) सकाळी या कट्ट्यांची पाहणी केली असता, ते ५० कट्टेही गायब असल्याचे दिसून आले.

बारदाण्याची अदलाबदल

या प्रकरणात हरभरा भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या बारदानाची अदलाबदल करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. हा प्रकार बाजार समितीच्या आवारात घडल्याने यात बाजार समिती प्रशासन लिप्त असल्याचा संंशय व्यक्त केला जात आहे. हरभरा खरेदीसाठी त्र्यंबक गिरीपुंजे भिवापूर येथील काही व्यापाऱ्यांच्या संपर्कात हाेते. या कामासाठी काही अडतीयांनी त्यांना नकार दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात लिप्त असलेली मंडळी आता नाफेडला बारदान पुरवणाऱ्या एजन्सीचा शाेध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड