शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माझे जीवनच गाणे झाले; शास्त्रीय गायिका कल्याणी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:09 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देउपशास्त्रीय संगीतात राज्य शासनाचा पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राज्य शासनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. मात्र आजपर्यंत केलेल्या संगीतसाधनेचे सार्थक झाल्यासारखे वाटते. नागपूरचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मनोहर नरहर बर्वे यांची मुलगी असल्याने बालपणीच गाण्याशी जुळले. काका पद््माकर बर्वे यांचाही प्रभाव होताच. त्यामुळे गाणं ऐकले, गाणं शिकले व गाणं जगले. आज आयुष्यच सुखद गाणं झाले, असे वाटते’ नागपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांनी व्यक्त केलेले हे मनोगत अगदी त्यांच्या गाण्याप्रमाणेच स्वच्छ व निखळ आहे.राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. शास्त्रीय संगीत किंवा गायन हे चित्रपटातील गाण्यासारखे नसते, त्यामुळे त्वरित लोकप्रिय होईल, ही शक्यताही नसते. अंतर्मनातून आलेले हे गाणे लोकप्रिय होण्याच्या अपेक्षेपेक्षा अंतर्मनातील सुखावण्यासाठी अधिक असते. अनेक वर्षांची साधना, तपस्या आणि समर्पण यामध्ये असते. याच कठोर साधनेतून डॉ. कल्याणी देशमुख या नावाची ओळख निर्माण झाली आहे.डॉ. देशमुख यांना शास्त्रीय संगीताची खास आवड, मात्र उपशास्त्रीय संगीतातही त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गाण्याकडे माझी ओढ पाहून वडिलांनीही ‘तू फक्त गाणच गा’ असा सल्ला दिला. वडिलांकडूनच त्यांनी उत्तर भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांच्या तालमीत तावून सुलाखून निघालेल्या डॉ. कल्याणी यांनी आपली ओळख निर्माण केली. ठुमरी, दादरा, भजन आणि अभंग गायनात त्यांची ओळख आहे. मात्र मराठी नाट्य संगीत हेही त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांची स्वरांची जादू ग्वाल्हेर घराण्याचे खयाली गायकी, किराणा आणि पतियाळा घराण्याची आलापी त्यांच्या अभिजात गायनात दिसून येते. त्यांनी सांगितले, शास्त्रीय संगीतात नियमांचे काटेकार पालन करावे लागते. मात्र उपशास्त्रीय गायनात नियम थोडे सैल होतात. त्यात सौंदर्य, भावाभिव्यक्ती अधिक असते. रागांच्या स्वरांचे साधर्म्य साधत सूर, ताल, लय आणि शब्द यांचा डौल सांभाळून सौंदर्याची अनुभूती लोकांपर्यंत पोहोचविणे त्यात महत्त्वाचे असते. आकाशवाणीच्या प्रथम श्रेणी सादरकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली संगीताची देणगी आयुष्यभर जपण्याची प्रयत्न केल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.मानसशास्त्रातील आचार्य पदवी प्राप्त डॉ. कल्याणी देशमुख यांना सहाव्या महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवात सन्मानित करण्यात आले. १९८४ साली सूर सिंगर संसद, मुंबईतर्फे सूरमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. राज्य शासनाच्या पुरस्काराने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

टॅग्स :musicसंगीत