शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

माझे जीवनच गाणे झाले; शास्त्रीय गायिका कल्याणी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:09 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देउपशास्त्रीय संगीतात राज्य शासनाचा पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राज्य शासनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. मात्र आजपर्यंत केलेल्या संगीतसाधनेचे सार्थक झाल्यासारखे वाटते. नागपूरचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मनोहर नरहर बर्वे यांची मुलगी असल्याने बालपणीच गाण्याशी जुळले. काका पद््माकर बर्वे यांचाही प्रभाव होताच. त्यामुळे गाणं ऐकले, गाणं शिकले व गाणं जगले. आज आयुष्यच सुखद गाणं झाले, असे वाटते’ नागपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांनी व्यक्त केलेले हे मनोगत अगदी त्यांच्या गाण्याप्रमाणेच स्वच्छ व निखळ आहे.राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. शास्त्रीय संगीत किंवा गायन हे चित्रपटातील गाण्यासारखे नसते, त्यामुळे त्वरित लोकप्रिय होईल, ही शक्यताही नसते. अंतर्मनातून आलेले हे गाणे लोकप्रिय होण्याच्या अपेक्षेपेक्षा अंतर्मनातील सुखावण्यासाठी अधिक असते. अनेक वर्षांची साधना, तपस्या आणि समर्पण यामध्ये असते. याच कठोर साधनेतून डॉ. कल्याणी देशमुख या नावाची ओळख निर्माण झाली आहे.डॉ. देशमुख यांना शास्त्रीय संगीताची खास आवड, मात्र उपशास्त्रीय संगीतातही त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गाण्याकडे माझी ओढ पाहून वडिलांनीही ‘तू फक्त गाणच गा’ असा सल्ला दिला. वडिलांकडूनच त्यांनी उत्तर भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांच्या तालमीत तावून सुलाखून निघालेल्या डॉ. कल्याणी यांनी आपली ओळख निर्माण केली. ठुमरी, दादरा, भजन आणि अभंग गायनात त्यांची ओळख आहे. मात्र मराठी नाट्य संगीत हेही त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांची स्वरांची जादू ग्वाल्हेर घराण्याचे खयाली गायकी, किराणा आणि पतियाळा घराण्याची आलापी त्यांच्या अभिजात गायनात दिसून येते. त्यांनी सांगितले, शास्त्रीय संगीतात नियमांचे काटेकार पालन करावे लागते. मात्र उपशास्त्रीय गायनात नियम थोडे सैल होतात. त्यात सौंदर्य, भावाभिव्यक्ती अधिक असते. रागांच्या स्वरांचे साधर्म्य साधत सूर, ताल, लय आणि शब्द यांचा डौल सांभाळून सौंदर्याची अनुभूती लोकांपर्यंत पोहोचविणे त्यात महत्त्वाचे असते. आकाशवाणीच्या प्रथम श्रेणी सादरकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली संगीताची देणगी आयुष्यभर जपण्याची प्रयत्न केल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.मानसशास्त्रातील आचार्य पदवी प्राप्त डॉ. कल्याणी देशमुख यांना सहाव्या महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवात सन्मानित करण्यात आले. १९८४ साली सूर सिंगर संसद, मुंबईतर्फे सूरमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. राज्य शासनाच्या पुरस्काराने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

टॅग्स :musicसंगीत