शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

माझे जीवनच गाणे झाले; शास्त्रीय गायिका कल्याणी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:09 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देउपशास्त्रीय संगीतात राज्य शासनाचा पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राज्य शासनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. मात्र आजपर्यंत केलेल्या संगीतसाधनेचे सार्थक झाल्यासारखे वाटते. नागपूरचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मनोहर नरहर बर्वे यांची मुलगी असल्याने बालपणीच गाण्याशी जुळले. काका पद््माकर बर्वे यांचाही प्रभाव होताच. त्यामुळे गाणं ऐकले, गाणं शिकले व गाणं जगले. आज आयुष्यच सुखद गाणं झाले, असे वाटते’ नागपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांनी व्यक्त केलेले हे मनोगत अगदी त्यांच्या गाण्याप्रमाणेच स्वच्छ व निखळ आहे.राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. शास्त्रीय संगीत किंवा गायन हे चित्रपटातील गाण्यासारखे नसते, त्यामुळे त्वरित लोकप्रिय होईल, ही शक्यताही नसते. अंतर्मनातून आलेले हे गाणे लोकप्रिय होण्याच्या अपेक्षेपेक्षा अंतर्मनातील सुखावण्यासाठी अधिक असते. अनेक वर्षांची साधना, तपस्या आणि समर्पण यामध्ये असते. याच कठोर साधनेतून डॉ. कल्याणी देशमुख या नावाची ओळख निर्माण झाली आहे.डॉ. देशमुख यांना शास्त्रीय संगीताची खास आवड, मात्र उपशास्त्रीय संगीतातही त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गाण्याकडे माझी ओढ पाहून वडिलांनीही ‘तू फक्त गाणच गा’ असा सल्ला दिला. वडिलांकडूनच त्यांनी उत्तर भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांच्या तालमीत तावून सुलाखून निघालेल्या डॉ. कल्याणी यांनी आपली ओळख निर्माण केली. ठुमरी, दादरा, भजन आणि अभंग गायनात त्यांची ओळख आहे. मात्र मराठी नाट्य संगीत हेही त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांची स्वरांची जादू ग्वाल्हेर घराण्याचे खयाली गायकी, किराणा आणि पतियाळा घराण्याची आलापी त्यांच्या अभिजात गायनात दिसून येते. त्यांनी सांगितले, शास्त्रीय संगीतात नियमांचे काटेकार पालन करावे लागते. मात्र उपशास्त्रीय गायनात नियम थोडे सैल होतात. त्यात सौंदर्य, भावाभिव्यक्ती अधिक असते. रागांच्या स्वरांचे साधर्म्य साधत सूर, ताल, लय आणि शब्द यांचा डौल सांभाळून सौंदर्याची अनुभूती लोकांपर्यंत पोहोचविणे त्यात महत्त्वाचे असते. आकाशवाणीच्या प्रथम श्रेणी सादरकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली संगीताची देणगी आयुष्यभर जपण्याची प्रयत्न केल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.मानसशास्त्रातील आचार्य पदवी प्राप्त डॉ. कल्याणी देशमुख यांना सहाव्या महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवात सन्मानित करण्यात आले. १९८४ साली सूर सिंगर संसद, मुंबईतर्फे सूरमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. राज्य शासनाच्या पुरस्काराने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

टॅग्स :musicसंगीत