शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मुस्लीम मोर्चाने वाढवली होती पोलिसांची धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:21 IST

मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देशांततेत समारोप : पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.हिवाळी अधिवेशन आणि भव्य मोर्चे नागपूरकरांसाठी नवीन नाही. पोलिसांना नागपुरात मोर्चे हाताळण्याची सवय झाली आहे. मात्र, देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता २० डिसेंबरला सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात निघणारा मुस्लिमांचा मोर्चा लक्षवेधी राहील, असे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांच्या हृदयाची धडधड वाढली होती. राज्याचे सरकार नागपुरात आहे. मोर्चात काही उलटसुलट झाले तर त्याचे पडसाद देशभर उमटू शकतात, याची कल्पना असल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी खबरदारीचे सर्व उपाय केले होते. मोर्चाच्या आयोजकांसोबत बैठका घेतल्या. कुणीही चिथावणी देणारे भाषण करणार नाही, मोर्चेकरी हिंसक होतील किंवा कुणाच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. कारण मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्चात हजारोंच्या संख्येत मंडळी सहभागी होणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या सुरुवातीपासून तो शेवटच्या पॉर्इंटपर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्वच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाºयांसह सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरातून मोर्चावर नजर रोखण्यात आली होती. संविधान बचाव या बॅनरखाली चिटणीस पार्क येथून निघालेला हा मोर्चा सेंट्रल एव्हेन्यू, रामझुला मार्गाने एलआयसी चौकातील मोर्चा पॉर्इंटवर पोहचला. मोर्चात मुस्लिमांसोबतच अन्य धर्माचेही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची संख्या पोलिसांची धडधड वाढवत होती. मात्र,मोर्चा शांततेत पार पडला अन् पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.सर्वांना धन्यवाद : पोलीस आयुक्तधार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणारे शहर म्हणून नागपूरची देशभर ख्याती आहे. आजचा एवढा प्रचंड मोर्चा निघाला अन् कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी मोर्चेकरी अन् नागपूर जनतेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Muslimमुस्लीमMorchaमोर्चाPoliceपोलिस