शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मुस्लीम मोर्चाने वाढवली होती पोलिसांची धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:21 IST

मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देशांततेत समारोप : पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.हिवाळी अधिवेशन आणि भव्य मोर्चे नागपूरकरांसाठी नवीन नाही. पोलिसांना नागपुरात मोर्चे हाताळण्याची सवय झाली आहे. मात्र, देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता २० डिसेंबरला सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात निघणारा मुस्लिमांचा मोर्चा लक्षवेधी राहील, असे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांच्या हृदयाची धडधड वाढली होती. राज्याचे सरकार नागपुरात आहे. मोर्चात काही उलटसुलट झाले तर त्याचे पडसाद देशभर उमटू शकतात, याची कल्पना असल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी खबरदारीचे सर्व उपाय केले होते. मोर्चाच्या आयोजकांसोबत बैठका घेतल्या. कुणीही चिथावणी देणारे भाषण करणार नाही, मोर्चेकरी हिंसक होतील किंवा कुणाच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. कारण मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्चात हजारोंच्या संख्येत मंडळी सहभागी होणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या सुरुवातीपासून तो शेवटच्या पॉर्इंटपर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्वच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाºयांसह सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरातून मोर्चावर नजर रोखण्यात आली होती. संविधान बचाव या बॅनरखाली चिटणीस पार्क येथून निघालेला हा मोर्चा सेंट्रल एव्हेन्यू, रामझुला मार्गाने एलआयसी चौकातील मोर्चा पॉर्इंटवर पोहचला. मोर्चात मुस्लिमांसोबतच अन्य धर्माचेही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची संख्या पोलिसांची धडधड वाढवत होती. मात्र,मोर्चा शांततेत पार पडला अन् पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.सर्वांना धन्यवाद : पोलीस आयुक्तधार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणारे शहर म्हणून नागपूरची देशभर ख्याती आहे. आजचा एवढा प्रचंड मोर्चा निघाला अन् कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी मोर्चेकरी अन् नागपूर जनतेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Muslimमुस्लीमMorchaमोर्चाPoliceपोलिस