शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मोर्चाने वाढवली होती पोलिसांची धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:21 IST

मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देशांततेत समारोप : पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.हिवाळी अधिवेशन आणि भव्य मोर्चे नागपूरकरांसाठी नवीन नाही. पोलिसांना नागपुरात मोर्चे हाताळण्याची सवय झाली आहे. मात्र, देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता २० डिसेंबरला सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात निघणारा मुस्लिमांचा मोर्चा लक्षवेधी राहील, असे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांच्या हृदयाची धडधड वाढली होती. राज्याचे सरकार नागपुरात आहे. मोर्चात काही उलटसुलट झाले तर त्याचे पडसाद देशभर उमटू शकतात, याची कल्पना असल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी खबरदारीचे सर्व उपाय केले होते. मोर्चाच्या आयोजकांसोबत बैठका घेतल्या. कुणीही चिथावणी देणारे भाषण करणार नाही, मोर्चेकरी हिंसक होतील किंवा कुणाच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. कारण मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्चात हजारोंच्या संख्येत मंडळी सहभागी होणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या सुरुवातीपासून तो शेवटच्या पॉर्इंटपर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्वच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाºयांसह सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरातून मोर्चावर नजर रोखण्यात आली होती. संविधान बचाव या बॅनरखाली चिटणीस पार्क येथून निघालेला हा मोर्चा सेंट्रल एव्हेन्यू, रामझुला मार्गाने एलआयसी चौकातील मोर्चा पॉर्इंटवर पोहचला. मोर्चात मुस्लिमांसोबतच अन्य धर्माचेही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची संख्या पोलिसांची धडधड वाढवत होती. मात्र,मोर्चा शांततेत पार पडला अन् पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.सर्वांना धन्यवाद : पोलीस आयुक्तधार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणारे शहर म्हणून नागपूरची देशभर ख्याती आहे. आजचा एवढा प्रचंड मोर्चा निघाला अन् कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी मोर्चेकरी अन् नागपूर जनतेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Muslimमुस्लीमMorchaमोर्चाPoliceपोलिस