शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

खून करून मृतदेह पेट्राेल टाकून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (पर्बत) शिवारात गुरुवारी रात्री घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रिधाेरा, ता. काटाेल) असे मृताचे तर अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा़ रेस्ट हाऊसजवळ काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा़ धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा़ धर्मशाळामागे, तारबाजार काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ अंगद हा अमाेल नागपुरे व वैभव हिवसे दाेघेही रा. रिधाेरा यांच्यासाेबत गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-०४/एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या क्वाॅलीसने जेवण करण्यासाठी काटाेल येथील झुनका भाकर केंद्रात आले हाेते. ती क्वाॅलीस अंगदच्या मालकीची आहे. तिथे तिघेही दारू पीत बसले. जवळच वैभवचा मित्र आराेपी मंगेश व त्याचे मित्र अक्षय व गणेश दारू पीत हाेते.

दरम्यान, वैभवला दारू जास्त चढली असून, त्याला गावाला साेडून देण्याची बतावणी करीत मंगेश, अक्षय व गणेश क्वाॅलीसमध्ये बसले. अमाेल मात्र झुनका भाकर केंद्रातच हाेता. हे पाचही जण रिधाेऱ्याच्या दिशेने निघाले आणि परत काटाेल आले. त्यांनी वैभवला काटाेल येथील बसस्थानकाजवळ साेडले व तिघेही अंगदला घेऊन डाेंगरगावकडे निघून गेले. त्या तिघांनीही अंगदला क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला परत सावळी (पर्बत) शिवारात आणले व तिथे राेडलगत फेकून तिघांनीही घर गाठले.

आराेपींपैकी एकाने या कृत्याबाबत एकाला सांगितले. त्यामुळे कुणाला मारले हे बघण्यासाठी तिन्ही आराेपी व अन्य दाेघे माेटरसायकलने सावळी (पर्बत) शिवारात पाेहाेचले. त्यांनी अंगदचा शाेध घेताला. ताे जिवंत असल्याचे दिसून येताच अक्षयने त्याचा चाकून गळा चिरला. त्यानंतर काटाेलला परत येऊन त्यांनी साेबत पेट्राेल व टायर घेऊन घटनास्थळ गाठले. तिघांनीही अंगदच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून त्याचा जाळले, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.

....

खुनाचे कारण अस्पष्ट

अंगद रात्री घरी परत न असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. ताे आराेपींसाेबत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आराेपींना अंगदबाबत विचारपूस केली. मात्र, ताे यापूर्वीच गेल्याची माहिती आराेपींनी अंगदच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी क्वाॅलीसची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना तुटफूट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अंगदसाेबत अनुचित प्रकार झाल्याचा त्यांना संशय आला. त्यातच अंगदचा खून करण्यात आल्याची माहिती देवेंद्र खरपुरियाने पाेलिसांना दिली. तिन्ही आराेपी अट्टल व्यसनी असून, त्यांनी अंगदचा खून नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.