शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नागपूरच्या नंदनवनमधील मर्डर मिस्ट्री ; नराधमास मिळाला नाही वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:26 IST

स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठळक मुद्दे ३० जूनपर्यंत पीसीआर : सुरक्षेसाठी पोलिसांची खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.नंदनवनमधील आराधनानगरात राहणारे कमलाकर पवनकर यांच्या घरात शिरून ११ जूनच्या पहाटे ३ च्या सुमारास क्रूरकर्मा पालटकरने जावई कमलाकर, बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, कमलाकरची आई मीराबाई तसेच स्वत:चा पाच वर्षांचा मुलगा कृष्णा पालटकर याची लोखंडी सब्बलचे फटके मारून निर्घृण हत्या केली होती. हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी दिल्लीला पळाला. तेथून तो लुधियानाला पोहचला. तेथे एका बिहारी मजुराच्या माध्यमातून त्याने सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरातील एका कंपनीत काम धरले. बाजूलाच एका चाळीत तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. गुरुवारी त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियानात जेरबंद केले. तेथून त्याला शुक्रवारी सायंकाळी नागपुरात आणले. आज शनिवारी त्याला न्या. जी. सी. फुलझलके यांच्या न्यायालयात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंके यांनी हजर केले. मुख्य जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी आरोपी पालटकर याने एकापेक्षा जास्त हत्यारांचा वापर करून मृतांचे डोके छिन्नविछिन्न केले. त्यामुळे ते हत्यार कोणते, त्याचा शोध घ्यायचा आहे. आरोपी वर्षभरापूर्वी कारागृहातून बाहेर आला, या कालावधीत तो कुठे कुठे वास्तव्याला होता, ते शोधायचे आहे. हत्या करताना आरोपीने जी क्रूरता दाखवली ती कोणत्या कारणामुळे, त्याची माहिती मिळवायची आहे. हा गुन्हा करण्यासाठी आरोपीला कुणी चिथावणी दिली काय किंवा त्याचा कुणी साथीदार आहे काय, त्याची माहिती मिळवायची आहे, असे मुद्दे न्या. फुलझलके यांच्यासमोर मांडले. त्याचा २ जुलैपर्यंत पीसीआर मिळावा, अशी विनंती केली. न्यायालयाने आरोपीला ३० जूनपर्यंत पीसीआर मंजूर केला.---आरोपीला वकील मिळाला नाहीया हत्याकांडाने केवळ पवनकर कुटुंबीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आरोपीच्या बाजूने आज कोणत्याच वकिलाने न्यायालयात बाजू मांडली नाही. आरोपीला न्यायालयात हजर करताना अनुचित घटना घडू शकते, हे ध्यानात घेत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर