शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आता मनपाच्या निवडणुका हेच काँग्रेसचे लक्ष्य; कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 12:57 IST

ब्लॉक आणि बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच जनतेच्या समस्या ठळकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले.

नागपूर : महानगरपालिकेत सत्ता येण्यासाठी काँग्रेसला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. मनपा निवडणुका हेच पक्षाचे ध्येय असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वागत समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी मनपा निवडणुकीबाबत चर्चादेखील केली.

वाढत्या महागाईमुळे लोकांचा भाजपवर भ्रमनिरास होत असून, त्याचा पुरेपूर फायदा महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळू शकतो. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आता कंबर कसून मैदानात उतरले पाहिजे. ब्लॉक आणि बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच जनतेच्या समस्या ठळकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले.

गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेची कोणती कामे लटकत आहेत, कुठे गडबड झाली आहे, याचे संपूर्ण सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, उद्योग व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा, उत्तर भारतीय सेलचे प्रमुख उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, उमेश डांगे, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव राजा तिडके, माजी नगरसेवक प्रशांत धवड, योगेश (गुड्डू) तिवारी, बाळ कुलकर्णी, नीलेश खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका