शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
5
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
6
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
7
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
8
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
9
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
10
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
11
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
12
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
13
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
14
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
15
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
16
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
17
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
18
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
19
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
20
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
Daily Top 2Weekly Top 5

नगर रचना विभागामुळे मनपाची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 21:55 IST

NMC financial dilemma महापालिकेला दर महिन्याला जीएसटी अनुदानाचे १०० कोटी मिळत आहे. मालमत्ता व पाणीपट्टीची वसुली वाढली आहे. परंतु मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगर रचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली आहे. मनपाच्या वित्त विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देउत्पन्न घटले, बाजार विभागही माघारला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेला दर महिन्याला जीएसटी अनुदानाचे १०० कोटी मिळत आहे. मालमत्ता व पाणीपट्टीची वसुली वाढली आहे. परंतु मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगर रचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली आहे. मनपाच्या वित्त विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. नगर रचना विभागाने मागील वित्त वर्षात १९३.४७ कोटी जमा केले होते. परंतु यावर्षी ३१ जानेवारीपर्यंत म्हणजेच चालू वित्त वर्षाच्या दहा महिन्यात फक्त ४०.११ कोटी जमा झाले आहे. मार्च अखेरपर्यंत फार तर १५ ते २० कोटीचे उत्पन्न होईल, अशी आशा आहे.

नगर रचना विभागाला मागील वित्त वर्षात गुंठेवारीचे भूखंड व ले-आऊट नियमितीकरणाचे अधिकार मिळाले होते. त्यावेळी मनपाने ३१ मार्च २०२० पर्यंत १९.३० कोटीची कमाई केली होती. यावर्षी ३१ जानेवारीपर्यंत ४२.४५ कोटी जमा झाले. गतवर्षाच्या तुलनेत २३.१५ कोटींनी अधिक आहे. आता गुंठेवारी विभाग नासुप्रकडे परत जाणार आहे. अशा परिस्थितीत मनपाला वर्षाला ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे.

कोविड संसर्ग व लॉकडाऊनमुळे बाजार विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ५ मार्चपर्यंत ९.५९ कोटी उत्पन्न होते. यावर्षी याच कालावधीत ७.११ कोटी जमा झाले. बाजार विभाग २.४८ कोटींनी मागे आहे. स्थापत्य, जाहिरात विभागाकडे लक्ष दिल्यास उत्पन्नात दुप्पट वाढ होऊ शकते. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने नुकत्याच बदल्या केल्या. मनुष्यबळाची समस्या दूर केली नाही. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याची माहिती स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष विजय झलके यांनी दिली. या विभागात कार्यरत कर्मचारी सक्षम नाही. या विभागाला तांत्रिक माहिती असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने आपल्या मर्जीनुसार गरज नसतानाही फेरबदल केल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

अभय योजनेमुळेही सुधारणा नाही

थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता व पाणीकरासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना आणली. पदाधिकारी व प्रशासनाला यातून उत्पन्नवाढीची आशा होती, परंतु असे घडले नाही. मालमत्ताकरात ५ मार्चपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ कोटी तर पाणीकरात १२.३६ कोटी उत्पन्न वाढले आहे.

विभाग वर्ष २०२०  -  वर्ष २०२१

मालमत्ता कर २१६.०० -२२४.००

पाणीकर १३०.७६.- १४३.१४

बाजार ९.५९- ७.११

जाहिरात २.७३ -२.३७

एलबीटी ३.३२ -५.२७

स्थापत्य ३.१०- ४.३६

(दोन्ही वर्षातील ५ मार्चपर्यंतचे आकडे)

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका