शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नगर रचना विभागामुळे मनपाची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 21:55 IST

NMC financial dilemma महापालिकेला दर महिन्याला जीएसटी अनुदानाचे १०० कोटी मिळत आहे. मालमत्ता व पाणीपट्टीची वसुली वाढली आहे. परंतु मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगर रचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली आहे. मनपाच्या वित्त विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देउत्पन्न घटले, बाजार विभागही माघारला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेला दर महिन्याला जीएसटी अनुदानाचे १०० कोटी मिळत आहे. मालमत्ता व पाणीपट्टीची वसुली वाढली आहे. परंतु मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगर रचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली आहे. मनपाच्या वित्त विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. नगर रचना विभागाने मागील वित्त वर्षात १९३.४७ कोटी जमा केले होते. परंतु यावर्षी ३१ जानेवारीपर्यंत म्हणजेच चालू वित्त वर्षाच्या दहा महिन्यात फक्त ४०.११ कोटी जमा झाले आहे. मार्च अखेरपर्यंत फार तर १५ ते २० कोटीचे उत्पन्न होईल, अशी आशा आहे.

नगर रचना विभागाला मागील वित्त वर्षात गुंठेवारीचे भूखंड व ले-आऊट नियमितीकरणाचे अधिकार मिळाले होते. त्यावेळी मनपाने ३१ मार्च २०२० पर्यंत १९.३० कोटीची कमाई केली होती. यावर्षी ३१ जानेवारीपर्यंत ४२.४५ कोटी जमा झाले. गतवर्षाच्या तुलनेत २३.१५ कोटींनी अधिक आहे. आता गुंठेवारी विभाग नासुप्रकडे परत जाणार आहे. अशा परिस्थितीत मनपाला वर्षाला ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे.

कोविड संसर्ग व लॉकडाऊनमुळे बाजार विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ५ मार्चपर्यंत ९.५९ कोटी उत्पन्न होते. यावर्षी याच कालावधीत ७.११ कोटी जमा झाले. बाजार विभाग २.४८ कोटींनी मागे आहे. स्थापत्य, जाहिरात विभागाकडे लक्ष दिल्यास उत्पन्नात दुप्पट वाढ होऊ शकते. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने नुकत्याच बदल्या केल्या. मनुष्यबळाची समस्या दूर केली नाही. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याची माहिती स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष विजय झलके यांनी दिली. या विभागात कार्यरत कर्मचारी सक्षम नाही. या विभागाला तांत्रिक माहिती असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने आपल्या मर्जीनुसार गरज नसतानाही फेरबदल केल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

अभय योजनेमुळेही सुधारणा नाही

थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता व पाणीकरासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना आणली. पदाधिकारी व प्रशासनाला यातून उत्पन्नवाढीची आशा होती, परंतु असे घडले नाही. मालमत्ताकरात ५ मार्चपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ कोटी तर पाणीकरात १२.३६ कोटी उत्पन्न वाढले आहे.

विभाग वर्ष २०२०  -  वर्ष २०२१

मालमत्ता कर २१६.०० -२२४.००

पाणीकर १३०.७६.- १४३.१४

बाजार ९.५९- ७.११

जाहिरात २.७३ -२.३७

एलबीटी ३.३२ -५.२७

स्थापत्य ३.१०- ४.३६

(दोन्ही वर्षातील ५ मार्चपर्यंतचे आकडे)

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका