शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

महावितरणचा शॉक, ६० ग्राहकांचे कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा ...

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा केला नाही. आठवडाभरापूर्वी महावितरणने विद्युत बिल भरा, अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा अल्टिमेटम दिला. त्यानुसार (दि. १०) भिवापूर तालुक्यातील तब्बल ६० जणांचा (ग्राहकांचा) घरगुती विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. तालुक्यात घरगुती विद्युत ग्राहकांची संख्या १७,०४६ इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांनी सर्वप्रथम पोटाची खळगी भरण्याला प्राथमिकता दिली. यादरम्यान रीडिंग न घेता सरासरी पाठविलेल्या विद्युत बिलांमुळे थकीत रकमेचा आकडा फुगत गेला. या काळात तालुक्यातील थकीत रकमेचा हा आकडा ३.५१ कोटीवर पोहोचला. शासनाच्या भूलथापांना बळी पडत, अनेकांनी उधारवाडीतून थकीत बिलाची काहीअंशी रक्कम भरली. मात्र अद्यापही अनेक ग्राहकांकडे विद्युत बिल थकीत असून बिल भरण्याची त्यांची कुवत नाही. कारण लॉकडाऊननंतर अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच महावितरणने पंधरवड्यापूर्वी थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले तर, काहींना मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून बिल भरण्याच्या सूचना केल्या. १५ दिवसाच्या आत थकीत रकमेचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशाराही नोटिसीतून दिला होता. मात्र ज्यांना दोनवेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे अशा अनेकांना विद्युत बिलाचा भरणा करणे अद्यापही शक्य झाले नाही. दरम्यान, महावितरणने नोटीस पाठविलेल्या थकीत विद्युत बिल ग्राहकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली. यात भिवापूरसह तालुक्यातील ६० वर नागरिकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात महावितरण विरोधात असंतोष खदखदत आहे.

४,२३७ ग्राहकांना नोटीस

तालुक्यात १७,०४६ ग्राहक असून यातील थकीत बिल असलेल्या ४,२३७ ग्राहकांना महावितरणने लेखी व एसएमएसद्वारे नोटीस पाठविले आहे. या ग्राहकांकडे थकीत विद्युत बिलाचा आकडा २ कोटी ३३ लाख रुपये आहे. सद्यस्थितीत यातील ६० वर ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

--

महावितरणने थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले आहे. १५ दिवसाच्या आत थकीत रक्कम भरण्याचे सुचविले आहे. मात्र त्यानंतरही थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाचा १ फेब्रुवारीपासून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. ग्राहकांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही. मात्र देयकाचा भरणा होत नसल्यामुळे ग्राहकांवर थकीत रक्कम वाढत आहे. परिणामी आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

दामोधर उरकुडे

उपकार्यकारी अभियंता, महावितरण, भिवापूर

-

लॉकडाऊन संपले असले तरी रोजगाराची परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. अशात गोरगरीब, गरजूच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून त्यांना अंधारयातना देणे योग्य नाही. जवराबोडी येथील विलास बांते हे दूधविक्रीच्या अल्पमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केला. बांते यांनी एक दिवसाची मुदत मागितली होती. मात्र काहीएक न ऐकता कारवाई करण्यात आली. आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या ऊर्जामंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महावितरणची ही कारवाई निषेधार्ह आहे.

रोहित पारवे,

जिल्हा महामंत्री, भाजपा युवा मोर्चा