शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरणचा शॉक, ६० ग्राहकांचे कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा ...

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा केला नाही. आठवडाभरापूर्वी महावितरणने विद्युत बिल भरा, अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा अल्टिमेटम दिला. त्यानुसार (दि. १०) भिवापूर तालुक्यातील तब्बल ६० जणांचा (ग्राहकांचा) घरगुती विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. तालुक्यात घरगुती विद्युत ग्राहकांची संख्या १७,०४६ इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांनी सर्वप्रथम पोटाची खळगी भरण्याला प्राथमिकता दिली. यादरम्यान रीडिंग न घेता सरासरी पाठविलेल्या विद्युत बिलांमुळे थकीत रकमेचा आकडा फुगत गेला. या काळात तालुक्यातील थकीत रकमेचा हा आकडा ३.५१ कोटीवर पोहोचला. शासनाच्या भूलथापांना बळी पडत, अनेकांनी उधारवाडीतून थकीत बिलाची काहीअंशी रक्कम भरली. मात्र अद्यापही अनेक ग्राहकांकडे विद्युत बिल थकीत असून बिल भरण्याची त्यांची कुवत नाही. कारण लॉकडाऊननंतर अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच महावितरणने पंधरवड्यापूर्वी थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले तर, काहींना मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून बिल भरण्याच्या सूचना केल्या. १५ दिवसाच्या आत थकीत रकमेचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशाराही नोटिसीतून दिला होता. मात्र ज्यांना दोनवेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे अशा अनेकांना विद्युत बिलाचा भरणा करणे अद्यापही शक्य झाले नाही. दरम्यान, महावितरणने नोटीस पाठविलेल्या थकीत विद्युत बिल ग्राहकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली. यात भिवापूरसह तालुक्यातील ६० वर नागरिकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात महावितरण विरोधात असंतोष खदखदत आहे.

४,२३७ ग्राहकांना नोटीस

तालुक्यात १७,०४६ ग्राहक असून यातील थकीत बिल असलेल्या ४,२३७ ग्राहकांना महावितरणने लेखी व एसएमएसद्वारे नोटीस पाठविले आहे. या ग्राहकांकडे थकीत विद्युत बिलाचा आकडा २ कोटी ३३ लाख रुपये आहे. सद्यस्थितीत यातील ६० वर ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

--

महावितरणने थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले आहे. १५ दिवसाच्या आत थकीत रक्कम भरण्याचे सुचविले आहे. मात्र त्यानंतरही थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाचा १ फेब्रुवारीपासून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. ग्राहकांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही. मात्र देयकाचा भरणा होत नसल्यामुळे ग्राहकांवर थकीत रक्कम वाढत आहे. परिणामी आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

दामोधर उरकुडे

उपकार्यकारी अभियंता, महावितरण, भिवापूर

-

लॉकडाऊन संपले असले तरी रोजगाराची परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. अशात गोरगरीब, गरजूच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून त्यांना अंधारयातना देणे योग्य नाही. जवराबोडी येथील विलास बांते हे दूधविक्रीच्या अल्पमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केला. बांते यांनी एक दिवसाची मुदत मागितली होती. मात्र काहीएक न ऐकता कारवाई करण्यात आली. आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या ऊर्जामंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महावितरणची ही कारवाई निषेधार्ह आहे.

रोहित पारवे,

जिल्हा महामंत्री, भाजपा युवा मोर्चा