शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वीज बिलामुळे महावितरण ‘बॅकफुटवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:59 IST

तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना भेटून बिलासंदर्भात समजावून सांगत आहेत. तीन महिन्याचे बिल असल्यामुळे ते वाढलेले दिसून येत असल्याचे ते सांगत आहेत. ग्राहकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समजावण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.लॉकडाऊन दरम्यान २३ मार्चपासून मीटर रिडिंग व बिल वितरण झाले नाही. यादरम्यान नागरिकांनाच आॅनलाईन रिडींग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु बहुतांश लोकांनी रिडींग पाठवले नाही. आता १ जूनपासून पुन्हा नियमित कामकाज सुरू झाले. मीटर रिडींग घेऊन बिल पाठवले जात आहे. त्यामुळे तीन महिन्याचे बिल एकाचवेळी आल्याने बिलाची रक्कम प्रचंड वाढली आहे. वाढीव बिलामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. ग्राहक कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलनेही होत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. कार्यालयात दररोज होणारी गर्दी पाहता महावितरणने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महावितरणचे अभियंते लोक प्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत. पारशिवनी पंचायत समितीच्या बैठकीत कंपनीच्या अभियंत्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास ठाकरे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर यांच्याशी चर्चा केली.कनिष्ठ अभियंता व एसडीओ आपापल्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी सुटीचा दिवस असतानाही भेटी घेण्यात आल्या. दरम्यान प्रत्येक असंतुष्ट नागरिकांना समजावण्यात येईल.दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल