शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलामुळे महावितरण ‘बॅकफुटवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:59 IST

तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना भेटून बिलासंदर्भात समजावून सांगत आहेत. तीन महिन्याचे बिल असल्यामुळे ते वाढलेले दिसून येत असल्याचे ते सांगत आहेत. ग्राहकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समजावण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.लॉकडाऊन दरम्यान २३ मार्चपासून मीटर रिडिंग व बिल वितरण झाले नाही. यादरम्यान नागरिकांनाच आॅनलाईन रिडींग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु बहुतांश लोकांनी रिडींग पाठवले नाही. आता १ जूनपासून पुन्हा नियमित कामकाज सुरू झाले. मीटर रिडींग घेऊन बिल पाठवले जात आहे. त्यामुळे तीन महिन्याचे बिल एकाचवेळी आल्याने बिलाची रक्कम प्रचंड वाढली आहे. वाढीव बिलामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. ग्राहक कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलनेही होत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. कार्यालयात दररोज होणारी गर्दी पाहता महावितरणने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महावितरणचे अभियंते लोक प्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत. पारशिवनी पंचायत समितीच्या बैठकीत कंपनीच्या अभियंत्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास ठाकरे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर यांच्याशी चर्चा केली.कनिष्ठ अभियंता व एसडीओ आपापल्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी सुटीचा दिवस असतानाही भेटी घेण्यात आल्या. दरम्यान प्रत्येक असंतुष्ट नागरिकांना समजावण्यात येईल.दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल