कलारंग नाट्यमहोेत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक सादर झाले. राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित या नाटकाने प्रेक्षकांना अगदी भरभरून हसवले. घरासाठी राबणाऱ्या स्त्रीच्या श्रमांचे वर्र्णन या नाटकात होते. अशा स्त्रीला आदर व प्रेम दिले की झाले. पण, तिच्या या श्रमाबद्दलची कृतज्ञ जाणीव किती कुटुंबात आढळते, असा प्रश्न या नाटकाने हसवता-हसवता प्रेक्षकांसमोर उभा केला. निर्मिती सावंत यांच्यासह, अरुण नलावडे, समीर चौघुले, मनमीत पेम, वनिता खरात यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या.
‘श्री बाई समर्थ’ने भरभरून हसवले
By admin | Updated: November 12, 2016 03:02 IST