शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

रहिवासी भागातच सर्वाधिक प्राणांतिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:09 IST

Road Accident News २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

ठळक मुद्देराष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर बळीअपघातांचे प्रमाण ८० टक्के

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठांच्या मार्गावर सर्वाधिक अपघात होतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूरकरांसाठी रहिवासी भागात होणारे अपघातच सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपुरात १ हजार ११९ अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचे बळी गेले व ८९९ लोक जखमी झाले. प्राणांतिक अपघातांत तब्बल २१८ जणांचा जीव रहिवासी भागांतील अपघातांत गेला. यात १८२ पुरुष तर ३६ महिलांचा समावेश होता. तर शाळा-महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांजवळ झालेल्या अपघातांमध्ये २८ पुरुष व ७ महिलांसह ३५ जणांना जीव गमवावा लागला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनुक्रमे १७२ व ७७ अपघात झाले व यात ९८ लोकांचा मृत्यू झाला.

कार्यालयीन घाई, जीवावर येईकार्यालय व आस्थापना सुरू होण्याची तसेच सुटण्याच्या वेळेतील घाई लोकांच्या जीवावर आली असल्याचे चित्र आहे. या सहा तासांत ३७६ अपघात झाले. ९ ते १२ च्या वेळेत १८७ अपघात झाले. तर रात्री ९ ते १२ या पार्टीटाईमच्या काळात १६७ अपघात झाले.

टॅग्स :Accidentअपघात