शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी भागातच सर्वाधिक प्राणांतिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:09 IST

Road Accident News २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

ठळक मुद्देराष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर बळीअपघातांचे प्रमाण ८० टक्के

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठांच्या मार्गावर सर्वाधिक अपघात होतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूरकरांसाठी रहिवासी भागात होणारे अपघातच सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपुरात १ हजार ११९ अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचे बळी गेले व ८९९ लोक जखमी झाले. प्राणांतिक अपघातांत तब्बल २१८ जणांचा जीव रहिवासी भागांतील अपघातांत गेला. यात १८२ पुरुष तर ३६ महिलांचा समावेश होता. तर शाळा-महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांजवळ झालेल्या अपघातांमध्ये २८ पुरुष व ७ महिलांसह ३५ जणांना जीव गमवावा लागला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनुक्रमे १७२ व ७७ अपघात झाले व यात ९८ लोकांचा मृत्यू झाला.

कार्यालयीन घाई, जीवावर येईकार्यालय व आस्थापना सुरू होण्याची तसेच सुटण्याच्या वेळेतील घाई लोकांच्या जीवावर आली असल्याचे चित्र आहे. या सहा तासांत ३७६ अपघात झाले. ९ ते १२ च्या वेळेत १८७ अपघात झाले. तर रात्री ९ ते १२ या पार्टीटाईमच्या काळात १६७ अपघात झाले.

टॅग्स :Accidentअपघात