शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:16 IST

नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातील आकडेवारी : नागपुरात ३६ तर चंद्रपूरमध्ये ५६ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली.सर्वाधिक ९३ आत्महत्या वर्धा जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या. यापैकी ५७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली, तर २३ प्रकरणे अपात्र ठरली. वर्ध्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात ५६ तर नागपूर जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूरमध्ये ३४ तर नागपुरात केवळ ८ शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी १३ आत्महत्या झाल्या. मात्र तेथील ११ प्रकरणे अपात्र ठरली व दोन कुटुंबीयांनाच मदत मिळाली.२००१ पासून वर्ध्यात १६०० हून अधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४००७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात एकट्या वर्धा जिल्ह्यात १६४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याखालोखाल चंद्रपूर (७५८), नागपूर (७३७), भंडारा (५३९), गोंदिया (२५०) व गडचिरोली (७७) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता