शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वर्षभरात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:16 IST

नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातील आकडेवारी : नागपुरात ३६ तर चंद्रपूरमध्ये ५६ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली.सर्वाधिक ९३ आत्महत्या वर्धा जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या. यापैकी ५७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली, तर २३ प्रकरणे अपात्र ठरली. वर्ध्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात ५६ तर नागपूर जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूरमध्ये ३४ तर नागपुरात केवळ ८ शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी १३ आत्महत्या झाल्या. मात्र तेथील ११ प्रकरणे अपात्र ठरली व दोन कुटुंबीयांनाच मदत मिळाली.२००१ पासून वर्ध्यात १६०० हून अधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४००७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात एकट्या वर्धा जिल्ह्यात १६४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याखालोखाल चंद्रपूर (७५८), नागपूर (७३७), भंडारा (५३९), गोंदिया (२५०) व गडचिरोली (७७) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता