शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपुरात तीन कंपन्यांमध्ये होणार ८ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 31, 2024 00:04 IST

- ३१ हजार कोटींची गुंतवणूक : एक नागपूर भागात तर अतिरिक्त एमआयडीसी बुटीबोरीमध्ये दोन प्रकल्प

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : सरकारसोबत आधीच सामंजस्य करार झालेल्या तीन मोठ्या कंपन्यांना राज्य सरकारच्या उद्योग मंत्रालयाने मंगळवारी नागपुरात उद्योग स्थापनेला मंजूरी दिली. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. या कंपन्यांवर आधारित सूक्ष्म आणि लघु उद्योग नव्याने सुरू होतील. परंतु, याआधीच्या अनुभवानुसार एलजी आणि रिन्यूव्ह एनर्जी कंपन्यांप्रमाणे उद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग होऊ नये, असे उद्योजकांचे मत आहे.

दोन ते तीन वर्षांत होणार प्रत्यक्ष उत्पादनउद्योग मंत्रालयाच्या मंजूरीनंतर जवळपास ३१ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून उभ्या होणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती  होईल. लिथियम बॅटरी, सोलर पीव्ही मॉड्युल्स व इलेक्ट्रोलायझर आणि मद्यार्क निर्मिती होणार आहे. सरकारच्या मंजूरीनंतर या कंपन्यांना उद्योगाच्या उभारणीसाठी वर्षभरात विविध विभागाची मंजूरी घ्यावी लागेल आणि दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करावे लागेल. याकरिता उद्योग विभागालाही तत्पर राहून कंपन्यांना मंजूरी द्याव्या लागतील. सकारात्मक बाबी घडून आल्यास कंपन्या उभ्या होतील आणि वैदर्भीय युवकांना रोजगार मिळेल, असे उद्योजकांनी सांगितले.

जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लिमिटेड कंपनी लिथियम बॅटरी निर्मितीचा मोठा प्रकल्प नागपूर भागात सुरू करणार आहे. जागा अद्याप निश्चित झालेला नाही. पण हा प्रकल्पही नागपुरातील अतिरिक्त एमआयडीसी बुटीबोरीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. तर, आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प नागपुरातील अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरीमध्ये जवळपास ४ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून सुरू होणार आहे. हा प्रकल्प नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राहील. या प्रकल्पातून अडीच ते तीन हजार युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील. आवाडा इलेक्ट्रो कंपनी ही कंपनी जपानच्या हिताचीची उपकंपनी असल्याची माहिती आहे.

दोन वर्षात सुरू होणार परनॉर्ड रिकार्ड इंडिया कंपनीराज्य सरकारसोबत २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपुरात सामंजस्य करार झालेल्या परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लि.ला अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये प्रकल्प स्थापनेला मंजूरी मिळाली असून दोन वर्षांतच मद्यार्क निर्मितीला सुरुवात होईल. हा प्रकल्प १०० एकरात उभा राहील. कंपनी दहा वर्षांच्या कालावधीत १,७८५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवीन डिस्टिलरीमुळे उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल. दररोज ६० हजार लिटर क्षमतेचे हे युनिट भारतातील सर्वात मोठी माल्ट डिस्टिलरी म्हणून ओळखली जाईल.

टॅग्स :nagpurनागपूर