शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नागपुरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 11:31 IST

२०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ३७० हून अधिकांनी संपविले जीवनआजारपणासमोरदेखील टेकताहेत गुडघे

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकत्रित कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र मागील काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच दिसून येत असून त्यामुळे कौटुंबिक समस्यादेखील निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच कौटुंबिक समस्या अनेकांच्या जीवावरदेखील उठत आहेत. २०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ही बाब निश्चितच अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली कौटुंबिक समस्यांमुळे नागपुरातील ३७१ जणांनी आत्महत्या केली. यात ३०२ पुरुष व ६९ महिला होत्या. दरम्यान, २०१९ या वर्षभरात नागपुरात विविध कारणांमुळे तब्बल ६३६ लोकांनी स्वत:चे आयुष्य संपविले. यात ५२५ पुरुष व ११ महिलांचा समावेश होता. वर्षभरातील आत्महत्यांचे विश्लेषण केले असता जवळपास ५८.३३ टक्के आत्महत्यांचे कारण हे कौटुंबिक समस्या हेच होते. २०१८ मध्ये शहरात ६८० आत्महत्यांची नोंद झाली.आजारपणात रुग्णांना मानसिक आधार हवासद्यस्थितीत सगळीकडेच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. आजारपणात रुग्णांना मानसिक आधाराची फार आवश्यकता आहे हे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विविध आजारपणांमुळे शहरात वर्षभरात ११९ लोकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यात कर्करोगाचे २७, पक्षाघाताचे १७, मानसिक नैराश्याचे ४४ तर दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. आजारपणात रुग्णांना समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक बनविणे हे आव्हान असते व त्यासाठी योग्य संवाद साधला गेला पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नागपूर आठव्या स्थानीदेशभरातील आत्महत्यांकडे नजर टाकली असता नागपूर हे देशात आठव्या स्थानी आहे. तर राज्यात नागपूरचा समावेश तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १ हजार २२९, पुण्यात ७१९ आत्महत्यांची नोंद झाली. 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्या