शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 11:31 IST

२०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ३७० हून अधिकांनी संपविले जीवनआजारपणासमोरदेखील टेकताहेत गुडघे

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकत्रित कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र मागील काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच दिसून येत असून त्यामुळे कौटुंबिक समस्यादेखील निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच कौटुंबिक समस्या अनेकांच्या जीवावरदेखील उठत आहेत. २०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ही बाब निश्चितच अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली कौटुंबिक समस्यांमुळे नागपुरातील ३७१ जणांनी आत्महत्या केली. यात ३०२ पुरुष व ६९ महिला होत्या. दरम्यान, २०१९ या वर्षभरात नागपुरात विविध कारणांमुळे तब्बल ६३६ लोकांनी स्वत:चे आयुष्य संपविले. यात ५२५ पुरुष व ११ महिलांचा समावेश होता. वर्षभरातील आत्महत्यांचे विश्लेषण केले असता जवळपास ५८.३३ टक्के आत्महत्यांचे कारण हे कौटुंबिक समस्या हेच होते. २०१८ मध्ये शहरात ६८० आत्महत्यांची नोंद झाली.आजारपणात रुग्णांना मानसिक आधार हवासद्यस्थितीत सगळीकडेच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. आजारपणात रुग्णांना मानसिक आधाराची फार आवश्यकता आहे हे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विविध आजारपणांमुळे शहरात वर्षभरात ११९ लोकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यात कर्करोगाचे २७, पक्षाघाताचे १७, मानसिक नैराश्याचे ४४ तर दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. आजारपणात रुग्णांना समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक बनविणे हे आव्हान असते व त्यासाठी योग्य संवाद साधला गेला पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नागपूर आठव्या स्थानीदेशभरातील आत्महत्यांकडे नजर टाकली असता नागपूर हे देशात आठव्या स्थानी आहे. तर राज्यात नागपूरचा समावेश तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १ हजार २२९, पुण्यात ७१९ आत्महत्यांची नोंद झाली. 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्या