शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 11:31 IST

२०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ३७० हून अधिकांनी संपविले जीवनआजारपणासमोरदेखील टेकताहेत गुडघे

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकत्रित कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र मागील काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच दिसून येत असून त्यामुळे कौटुंबिक समस्यादेखील निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच कौटुंबिक समस्या अनेकांच्या जीवावरदेखील उठत आहेत. २०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ही बाब निश्चितच अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली कौटुंबिक समस्यांमुळे नागपुरातील ३७१ जणांनी आत्महत्या केली. यात ३०२ पुरुष व ६९ महिला होत्या. दरम्यान, २०१९ या वर्षभरात नागपुरात विविध कारणांमुळे तब्बल ६३६ लोकांनी स्वत:चे आयुष्य संपविले. यात ५२५ पुरुष व ११ महिलांचा समावेश होता. वर्षभरातील आत्महत्यांचे विश्लेषण केले असता जवळपास ५८.३३ टक्के आत्महत्यांचे कारण हे कौटुंबिक समस्या हेच होते. २०१८ मध्ये शहरात ६८० आत्महत्यांची नोंद झाली.आजारपणात रुग्णांना मानसिक आधार हवासद्यस्थितीत सगळीकडेच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. आजारपणात रुग्णांना मानसिक आधाराची फार आवश्यकता आहे हे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विविध आजारपणांमुळे शहरात वर्षभरात ११९ लोकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यात कर्करोगाचे २७, पक्षाघाताचे १७, मानसिक नैराश्याचे ४४ तर दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. आजारपणात रुग्णांना समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक बनविणे हे आव्हान असते व त्यासाठी योग्य संवाद साधला गेला पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नागपूर आठव्या स्थानीदेशभरातील आत्महत्यांकडे नजर टाकली असता नागपूर हे देशात आठव्या स्थानी आहे. तर राज्यात नागपूरचा समावेश तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १ हजार २२९, पुण्यात ७१९ आत्महत्यांची नोंद झाली. 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्या