शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नागपुरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 11:31 IST

२०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ३७० हून अधिकांनी संपविले जीवनआजारपणासमोरदेखील टेकताहेत गुडघे

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकत्रित कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र मागील काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच दिसून येत असून त्यामुळे कौटुंबिक समस्यादेखील निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच कौटुंबिक समस्या अनेकांच्या जीवावरदेखील उठत आहेत. २०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ही बाब निश्चितच अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली कौटुंबिक समस्यांमुळे नागपुरातील ३७१ जणांनी आत्महत्या केली. यात ३०२ पुरुष व ६९ महिला होत्या. दरम्यान, २०१९ या वर्षभरात नागपुरात विविध कारणांमुळे तब्बल ६३६ लोकांनी स्वत:चे आयुष्य संपविले. यात ५२५ पुरुष व ११ महिलांचा समावेश होता. वर्षभरातील आत्महत्यांचे विश्लेषण केले असता जवळपास ५८.३३ टक्के आत्महत्यांचे कारण हे कौटुंबिक समस्या हेच होते. २०१८ मध्ये शहरात ६८० आत्महत्यांची नोंद झाली.आजारपणात रुग्णांना मानसिक आधार हवासद्यस्थितीत सगळीकडेच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. आजारपणात रुग्णांना मानसिक आधाराची फार आवश्यकता आहे हे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विविध आजारपणांमुळे शहरात वर्षभरात ११९ लोकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यात कर्करोगाचे २७, पक्षाघाताचे १७, मानसिक नैराश्याचे ४४ तर दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. आजारपणात रुग्णांना समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक बनविणे हे आव्हान असते व त्यासाठी योग्य संवाद साधला गेला पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नागपूर आठव्या स्थानीदेशभरातील आत्महत्यांकडे नजर टाकली असता नागपूर हे देशात आठव्या स्थानी आहे. तर राज्यात नागपूरचा समावेश तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १ हजार २२९, पुण्यात ७१९ आत्महत्यांची नोंद झाली. 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्या