शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या एकूण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी प्राणहितामधून समुद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:33 IST

Total storage water capacity goes from Pranhita to sea महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

परतीच्या पावसाने मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या अनेक भागांना गेल्या आठवड्यात तडाखा दिला. अतिवृष्टीने झालेल्या हानीचे पंचनामे व राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटीच्या पॅकेजमधील मदत वाटपाचे काम सुरू असताना गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या अशाच नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या भागात जवळपास ९० हजार हेक्टर शेतीला अतिपावसाचा तडाखा बसला. वन कायद्याचा अडथळा असल्याने या भागात गोसेखुर्द वगळता मोठी धरणे नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महापुराचे पाणी गोदावरीची उपनदी प्राणहितामधून समुद्रात वाहून गेले.

१२०० टीएमसी पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले

 जलसंपदा विभागातील सूत्रांच्या मते, एरव्ही उशिरा दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीला यंदा मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे थोडा लवकर पूर आला. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या विदर्भातील प्रमुख नद्या आणि त्या सगळ्यांची मिळून बनलेली प्राणहिता यामधून जवळपास १००० ते १२०० अब्ज घनफूट (टीएमसी) इतके पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले.

  •  महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून ३ हजार २६४ धरणे आहेत.
  •  त्यांची एकूण साठवण क्षमता १७२० टीएमसी इतकी आहे.
  •  याचा अर्थ पूर्व विदर्भातून राज्याच्या एकूण साठाक्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी समुद्रात वाहून गेले.
टॅग्स :riverनदीWaterपाणीSea Routeसागरी महामार्ग