शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

राज्याच्या एकूण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी प्राणहितामधून समुद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:33 IST

Total storage water capacity goes from Pranhita to sea महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

परतीच्या पावसाने मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या अनेक भागांना गेल्या आठवड्यात तडाखा दिला. अतिवृष्टीने झालेल्या हानीचे पंचनामे व राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटीच्या पॅकेजमधील मदत वाटपाचे काम सुरू असताना गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या अशाच नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या भागात जवळपास ९० हजार हेक्टर शेतीला अतिपावसाचा तडाखा बसला. वन कायद्याचा अडथळा असल्याने या भागात गोसेखुर्द वगळता मोठी धरणे नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महापुराचे पाणी गोदावरीची उपनदी प्राणहितामधून समुद्रात वाहून गेले.

१२०० टीएमसी पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले

 जलसंपदा विभागातील सूत्रांच्या मते, एरव्ही उशिरा दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीला यंदा मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे थोडा लवकर पूर आला. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या विदर्भातील प्रमुख नद्या आणि त्या सगळ्यांची मिळून बनलेली प्राणहिता यामधून जवळपास १००० ते १२०० अब्ज घनफूट (टीएमसी) इतके पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले.

  •  महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून ३ हजार २६४ धरणे आहेत.
  •  त्यांची एकूण साठवण क्षमता १७२० टीएमसी इतकी आहे.
  •  याचा अर्थ पूर्व विदर्भातून राज्याच्या एकूण साठाक्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी समुद्रात वाहून गेले.
टॅग्स :riverनदीWaterपाणीSea Routeसागरी महामार्ग