शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्याच्या एकूण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी प्राणहितामधून समुद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:33 IST

Total storage water capacity goes from Pranhita to sea महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

परतीच्या पावसाने मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या अनेक भागांना गेल्या आठवड्यात तडाखा दिला. अतिवृष्टीने झालेल्या हानीचे पंचनामे व राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटीच्या पॅकेजमधील मदत वाटपाचे काम सुरू असताना गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या अशाच नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या भागात जवळपास ९० हजार हेक्टर शेतीला अतिपावसाचा तडाखा बसला. वन कायद्याचा अडथळा असल्याने या भागात गोसेखुर्द वगळता मोठी धरणे नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महापुराचे पाणी गोदावरीची उपनदी प्राणहितामधून समुद्रात वाहून गेले.

१२०० टीएमसी पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले

 जलसंपदा विभागातील सूत्रांच्या मते, एरव्ही उशिरा दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीला यंदा मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे थोडा लवकर पूर आला. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या विदर्भातील प्रमुख नद्या आणि त्या सगळ्यांची मिळून बनलेली प्राणहिता यामधून जवळपास १००० ते १२०० अब्ज घनफूट (टीएमसी) इतके पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले.

  •  महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून ३ हजार २६४ धरणे आहेत.
  •  त्यांची एकूण साठवण क्षमता १७२० टीएमसी इतकी आहे.
  •  याचा अर्थ पूर्व विदर्भातून राज्याच्या एकूण साठाक्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी समुद्रात वाहून गेले.
टॅग्स :riverनदीWaterपाणीSea Routeसागरी महामार्ग