शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात सव्वापाच हजाराहून अधिकांना मिळाली वैद्यकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:22 IST

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली.

ठळक मुद्देतीन वर्षांत ५१ कोटींहून अधिकचे अर्थसाहाय्य : मुख्यमंत्री साहाय्यता निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. आर्थिक निधीचा आकडा हा ५१ कोटींहून अधिक होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाकडे विचारणा केली होती. २०१७ सालापासून नागपुरातील नागरिकांना वैद्यकीय कारणांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती अर्ज नाकारण्यात आले, इत्यादी प्रश्न माहितीच्या अधिकारांतर्गत विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ५ जानेवारी २०१७ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत नागपूर येथील मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाकडे ९ हजार २१५ नागरिकांचे अर्ज आले. यातील ३ हजार ७८२ अर्ज फेटाळण्यात आले व प्रत्यक्षात ५ हजार ४३३ नागरिकांचे अर्ज मंजूर झाले. वैद्यकीय उपचारांसाठी या कालावधीत एकूण ५१ कोटी ७६ लाख ४० हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. सरासरी प्रत्येकाला ९५ हजार २७७ रुपयांची मदत झाली.नवीन सरकारच्या काळात ९० लाखांची मदत५ जानेवारी २०१७ ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ५ हजार ३८२ जणांना ५० कोटी ८५ लाख ५५ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर १८ डिसेंबर २०१९ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत ३०० अर्ज प्राप्त झाले. यातील १५१ जणांना वैद्यकीय उपचारांसाठी ९० लाख ८५ हजारांचे अर्थसाहाय्य मिळाले.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता