शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 17:37 IST

२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत शालेय पुस्तके पोहोचत नसल्याचे चित्र असताना, बालभारतीला मात्र हजारो टन पुस्तकांची विल्हेवाट लावावी लागत आहे. २०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीकडे विचारणा केली होती. २०१२ सालापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तके रद्दीत काढली, त्यापासून किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१२ पासून ते मार्च २०१९ या कालावधीत चार वेळा पुस्तके रद्दीत काढली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१२-१३, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ या साली पुस्तके रद्दीत काढण्यात आली. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक २ हजार ९८ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विकण्यात आली. 

पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ

कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीला रद्दीत पुस्तके काढण्यात आल्याची कारणे, उंदीर व वाळवीमुळे खराब झालेली पुस्तके, गोदामातील एकूण पुस्तके यांचीदेखील माहिती विचारली होती. ही सर्व माहिती एकाच विषयाशी संबंधित होती. परंतु बालभारतीच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी हे सर्व विषय वेगवेगळ्या मुद्द्यांशी निगडित असल्याचे कारण देत, माहिती देण्याचे टाळले. या माहितीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षण