शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:21 IST

२०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.

ठळक मुद्देमुला-मुलींच्या जन्मसंख्येत सातत्याने घट उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. राज्यातील अर्भक मृत्यू थांबण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेली आकडेवारी ही डोळ्यात अंजन टाकणारी आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत राज्यात किती अर्भक, बालमृत्यू झाले, तसेच बालमृत्यूचा दर किती होता, राज्यात किती मुले व मुलींचा जन्म झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यावर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एक वर्षांपर्यंतच्या २० हजार ७७० अर्भकांचा मृत्यू झाला. तर ८ हजार ७७३ उपजत मृत्यूंची नोंद झाली. बाल व माता मृत्यूंची संख्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार उपलब्ध नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये राज्यभरात ९३ लाख ३ हजार ७०० जन्मांची नोंद झाली. यात ४८ लाख ३७ हजार ५९९ मुले तर ४४ लाख ६६ हजार १०१ मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९२.३२ टक्के इतके होते.

जन्मसंख्येत पाच वर्षांत घटसंबंधित आकडेवारीनुसार २०१५ सालच्या तुलनेत पाच वर्षांत जन्मसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. २०१५ साली १० लाख १४ हजार २६३ मुले व ९ लाख ७९ हजार ७९९ मुली अशा एकूण १९ लाख ९४ हजार ६२ जन्मांची नोंद झाली. तर २०१९ साली हीच संख्या १४ लाख २३ हजार ४८७ (७,४३,०४८ मुले व ६,८०,४३९ मुली) इतकी होती. पाच वर्षांतच ५ लाख ७० हजार ५७५ ने जन्मसंख्या घटली.

टॅग्स :Deathमृत्यू