शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:21 IST

२०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.

ठळक मुद्देमुला-मुलींच्या जन्मसंख्येत सातत्याने घट उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. राज्यातील अर्भक मृत्यू थांबण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेली आकडेवारी ही डोळ्यात अंजन टाकणारी आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत राज्यात किती अर्भक, बालमृत्यू झाले, तसेच बालमृत्यूचा दर किती होता, राज्यात किती मुले व मुलींचा जन्म झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यावर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एक वर्षांपर्यंतच्या २० हजार ७७० अर्भकांचा मृत्यू झाला. तर ८ हजार ७७३ उपजत मृत्यूंची नोंद झाली. बाल व माता मृत्यूंची संख्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार उपलब्ध नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये राज्यभरात ९३ लाख ३ हजार ७०० जन्मांची नोंद झाली. यात ४८ लाख ३७ हजार ५९९ मुले तर ४४ लाख ६६ हजार १०१ मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९२.३२ टक्के इतके होते.

जन्मसंख्येत पाच वर्षांत घटसंबंधित आकडेवारीनुसार २०१५ सालच्या तुलनेत पाच वर्षांत जन्मसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. २०१५ साली १० लाख १४ हजार २६३ मुले व ९ लाख ७९ हजार ७९९ मुली अशा एकूण १९ लाख ९४ हजार ६२ जन्मांची नोंद झाली. तर २०१९ साली हीच संख्या १४ लाख २३ हजार ४८७ (७,४३,०४८ मुले व ६,८०,४३९ मुली) इतकी होती. पाच वर्षांतच ५ लाख ७० हजार ५७५ ने जन्मसंख्या घटली.

टॅग्स :Deathमृत्यू