शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:53 IST

एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नही ५.७७ कोटीने वाढले : खासगी वाहतुकीशी टक्कर देण्यासाठी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्क दयानंद पाईकरावनागपूर : एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.खासगी प्रवासी वाहतुकीच्या बसेसमध्ये अधिकाधिक सुविधा मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत होते. परंतु स्पर्धेच्या युगात आपण मागे राहू नये यासाठी एसटी महामंडळाने आत्मचिंतन करून प्रवासी आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी अनेक उपक्रम राबविले. यात नागपूर विभागात ११ मार्गावर दर अर्ध्या तासाने शटल सेवा, डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित शिवशाही बसेस, नॉन स्टॉप बसेसची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून दिली. याचाच परिणाम म्हणून तब्बल १९ लाख ६ हजार नव्या प्रवाशांनी एसटीवर आपला विश्वास दाखवून एसटीने प्रवास केल्याची माहिती महामंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. २०१६-१७ या वर्षी ६ कोटी ३५ लाख २५ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता, तर २०१७-१८ या वर्षी ६ कोटी ५४ लाख ३४ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यात एसटीच्या नागपूर विभागाच्या उत्पन्नात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने मारलेल्या या बाजीसाठी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाने एका पत्राद्वारे नागपूर विभागाचे अभिनंदन केले आहे. एसटीच्या नागपूर विभागाने १९ लाख नवे प्रवासी जोडले हे खरे आहे. परंतु प्रवाशांना सातत्याने चांगली सेवा पुरविण्याची आणि जोडल्या गेलेले प्रवासी टिकवून ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या नागपूर विभागावर येऊन ठेपली असून त्यात नागपूर विभाग कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरविणार आहे.सांघिक कामगिरीची फलश्रुती‘एसटी महामंडळाचे नागपूर विभागातील प्रवासी १९ लाखानी वाढले. उत्पन्नही ५.७७ कोटीने वाढले. या यशामागे नागपूर विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम असून सांघिक कामगिरी केल्यामुळेच हे यश गाठता आले.’-चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, नागपूर विभाग. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळBus Driverबसचालक