शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नागपुरातील १५ मीटरहून अधिक उंच व जुन्या इमारतींना ‘फायर अलर्ट ’यंत्रणा बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:32 IST

शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देअग्निशमन व विद्युत समितीचा निर्णयत्रिमूर्ती नगरात नवीन स्थानक

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.महापालिके च्या अग्निशमन विभागाकडे ‘फायर अलर्ट’ हॉटलाईन सिक्युरिटी यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारती या यंत्रणेशी जोडलेल्या नाही. त्यामुळे आता १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या जुन्या व नवीन इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रस्तावाला अग्निशमन व विद्युत समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.फायर सेफ्टी अ‍ॅक्टनुसार ज्या इमारतींची उंची १५ मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. आता त्यात फायर अलर्ट हॉटलाईन सिक्युरिटी सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे त्या इमारतींची सर्व माहिती अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असणार आहे. टाकीतील पाणी, अग्निशमन सेवा याचाही त्यात समावेश असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. यावेळी सभापती संजय बालपांडे, उपसभापती प्रमोद चिखले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर व सदस्य उपस्थित होते.अग्निशमन विभागामार्फ त शहरातील विहीर सफाईचे काम केले जाते. यावर लाखौं रुपयांचा खर्च विभागाला करावा लागतो. ही जबाबदारी आरोग्य विभागावर सोपविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सरकारी विहिरी या मोफत साफ करण्यात याव्यात. खासगी विहिरींकरिता नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.त्रिमूर्ती नगरात नवीन स्थानकत्रिमूर्ती नगरात नव्याने अग्निशमन स्थानकाची इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे बांधकाम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यासोबतच वाठोडा, गंजीपेठ येथील स्थानकांच्या इमारतीचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.

 

टॅग्स :fireआग