शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऑक्टाेबरमध्ये लांबणार नाही, वेळेतच परतेल मान्सून

By निशांत वानखेडे | Updated: September 11, 2024 18:27 IST

‘ला-निना’ प्रभावाला सध्या आधार नाही, तज्ज्ञांचे मत : नवरात्रात वळीव पावसाची शक्यता

नागपूर : सध्या सक्रिय झालेल्या ‘ला-निना’ च्या प्रभावामुळे यंदा सप्टेंबरसह ऑक्टाेबरमध्येही जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या अंदाजाला सध्यातरी काेणताही आधार नसल्याने मान्सून ऑक्टाेबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्या नियाेजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

शक्यतो ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर म्हणजे १५ ऑक्टोबरनंतर मोसमी पाऊस देशातून निघून जातो व दक्षिण भारतातील चार राज्यात तो ईशान्य किंवा हिवाळी पाऊस या नावाने तो सुरु होतो. ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा काळ सुरू होतो. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरु करतो. म्हणजे साधारण ५ ऑक्टोबरला माघारी परतत असतांना महाराष्ट्राच्या उत्तरेकडे प्रवेशतो व १५ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून बाहेर पडतो. याच दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या आवर्तनाचा पाऊस होत असतो. तसाच पाऊस यावर्षी ९ ते १३ दरम्यान पडण्याची शक्यता जाणवते. म्हणजेच घटस्थापनेच्या सातव्या दिवसापासून कदाचित महाराष्ट्रात वळीव स्वरूपाच्या मध्यम पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाची शक्यता कमी असते व या काळात थंडीची चाहूल जाणवते.

दरम्यान सध्या सक्रिय झालेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जाेरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. हा पाऊस ऑक्टाेबरमध्येही लांबेल, असेही भाकीत करण्यात आले आहे. याशिवाय हवामान बदलाच्या प्रभावाने मान्सूनचा काळ पुढे सरकत असून यंदा उशीरा सुरू झाल्याने ताे पुढे ऑक्टाेबरपर्यंत लांबेल, असेही मत व्यक्त केले जात आहे. मात्र ला-निनामुळे किंवा हवामान बदलाच्या प्रभावाने यंदा मान्सून लांबेल, अशा अंदाजाला सध्यातरी काही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट मत खुळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सरासरीच्या कमी किंवा जास्त किंवा सरासरी इतका पाऊस पडू शकतो, याचे भाकीत १ ऑक्टोबरच्या दरम्यानच व्यवस्थित सांगता येईल.

टॅग्स :nagpurनागपूर