शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून मान्सून गमन लांबणार? चार दिवस पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 21:24 IST

Nagpur News येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देऑक्टाेबरच्या पहिला आठवड्यात हाेता अंदाज

 

नागपूर : राजस्थानात ८१ दिवस मुक्काम केल्यानंतर पाकिस्तान सीमेलगतच्या भागातून मौसमी पावसाने मंगळवारपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातून राजस्थानच्या अतिवायव्येकडील टोकाकडून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घाेषणा हवामान विभागाने केली आहे. हा प्रवास करीत ताे १ ते ५ ऑक्टाेबर दरम्यान महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवास करीत निघून जाईल, असा अंदाज हाेता. साधारणत: १ सप्टेंबर पासूनच देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेताे. व ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातून निघून ताे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर स्थिरावताे, असे निश्चित मानले जाते. मात्र गेल्या वर्षीच हा निश्चित काळ बदलला. २०२१ मध्ये पाऊस उशिरा सुरू झाला आणि उशिराच निघून गेला. गेल्या वर्षी ६ ऑक्टाेबरला मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि तब्बल २३ ऑक्टाेबर नंतर ताे महाराष्ट्रातून निघाला हाेता. हवामान तज्ज्ञानुसार यावर्षी तेवढा वेळ लागणार नाही पण दरवर्षीच्या सरासरीपेक्षा उशिरा परतण्याची शक्यता नक्कीच आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून ते पुढील दाेन दिवसात दक्षिण-पश्चिम दिशेने ओडिसा व छत्तीसगडकडे वळणार आहे. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी गडचिराेली येथे ३२ मिमी पाऊस झाला व जिल्ह्यातही जाेर हाेता. इतर जिल्ह्यात मात्र काेरड हाेती. नागपुरात ही आकाश काहीसे ढगाळलेले हाेते पण पाऊस झाला नाही. मात्र २४ सप्टेंबरपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. या वातावरणीय परिस्थितीमुळे राज्यातून परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rainपाऊस