शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्रातून मान्सून गमन लांबणार? चार दिवस पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 21:24 IST

Nagpur News येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देऑक्टाेबरच्या पहिला आठवड्यात हाेता अंदाज

 

नागपूर : राजस्थानात ८१ दिवस मुक्काम केल्यानंतर पाकिस्तान सीमेलगतच्या भागातून मौसमी पावसाने मंगळवारपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातून राजस्थानच्या अतिवायव्येकडील टोकाकडून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घाेषणा हवामान विभागाने केली आहे. हा प्रवास करीत ताे १ ते ५ ऑक्टाेबर दरम्यान महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवास करीत निघून जाईल, असा अंदाज हाेता. साधारणत: १ सप्टेंबर पासूनच देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेताे. व ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातून निघून ताे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर स्थिरावताे, असे निश्चित मानले जाते. मात्र गेल्या वर्षीच हा निश्चित काळ बदलला. २०२१ मध्ये पाऊस उशिरा सुरू झाला आणि उशिराच निघून गेला. गेल्या वर्षी ६ ऑक्टाेबरला मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि तब्बल २३ ऑक्टाेबर नंतर ताे महाराष्ट्रातून निघाला हाेता. हवामान तज्ज्ञानुसार यावर्षी तेवढा वेळ लागणार नाही पण दरवर्षीच्या सरासरीपेक्षा उशिरा परतण्याची शक्यता नक्कीच आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून ते पुढील दाेन दिवसात दक्षिण-पश्चिम दिशेने ओडिसा व छत्तीसगडकडे वळणार आहे. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी गडचिराेली येथे ३२ मिमी पाऊस झाला व जिल्ह्यातही जाेर हाेता. इतर जिल्ह्यात मात्र काेरड हाेती. नागपुरात ही आकाश काहीसे ढगाळलेले हाेते पण पाऊस झाला नाही. मात्र २४ सप्टेंबरपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. या वातावरणीय परिस्थितीमुळे राज्यातून परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rainपाऊस