शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे.

प्रतीक्षा पावसाची : १.५ लाख हेक्टरवर नियोजननागपूर : मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे. कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुबलक बियाणे व खताचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्र असून कापूस १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमूग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी यंदा कृषी विभागाने ८३ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली आहे. शिवाय २ हजार ७०० क्विंटल बीटी कापूस, ३१ हजार ५०० क्विंटल भात, ७५० क्विंटल भुईमूग, १ हजार ६०० क्विंटल संकरित ज्वारी व २ हजार ७०० क्विंटल तूर बियाणे मागितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार त्यापैकी जिल्ह्यात सोयाबीनचे ४६ हजार ९६८ क्विंटल बियाणे पोहोचले आहे. तसेच कापसाचे २ हजार २१२, भात ८ हजार ९६५, संकरित ज्वारी ६०२ क्विंटल व तूर १ हजार १० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. याशिवाय उर्वरित पुरवठाही लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागातर्फे ‘मागेल त्याला बियाणे’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकुर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाने त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना कापूस, तूर व मका पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खत-बियाणे महागले यंदा खत व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल मिळणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या किमती ७ हजार ९५० रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच धानाच्या किमती ४ हजार ५०० रुपयांवरून ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्याच्या किमती ९ हजार ५०० रुपयांवरून १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खताच्याही किमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकऱ्याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे. सोयाबीनला कापसाचा पर्याय कापूस विदर्भातील प्रमुख पीक समजल्या जाते. गतवर्षी नागपूर विभागात सुमारे ३ लाख २ हजार ९९ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. परंतु यंदा त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, कृषी विभागाने ३ लाख २४ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे ८ हजार १६८ पॉकिट बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यानुसार महाबीज व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या बियाण्याची पूर्तता केली जाणार आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यासाठी १.५ लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची उगवण तपासणी -सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी.-किमान ७० टक्के उगवण शक्तीचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाण्याची पेरणी करावी. -उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाण्याचे प्रति हेक्टरी प्रमाण वाढवावे. -टोकन पद्घतीने बियाणे पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते. -सोयाबीनवर बीज प्रक्रिया करूनच त्याची पेरणी करावी.