शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:07 IST

कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देविधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकास्त्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कुठेही बाजार मिळू शकतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले पीक विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला ८ टक्क्यांपर्यंत सेस द्यावा लागत होता. मात्र आता असे होणार नाही. आपले पीक कुठे व कितीमध्ये विकायचे याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतील. त्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात तत्कालीन आघाडी सरकारने २००६ मध्ये कॉन्टेक्ट फार्मिंगला परवानगी दिली होते. त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. काँग्रेसनेच खासगी कृषी बाजार समितीला परवानगी दिली होती. आज या बाजारांमध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जारी केलेल्या घोषणापत्रात काँग्रेसने कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय विक्रीला परवानगी देणे, शेतकऱ्यांना कुठेही विक्रीची परवानगी देणे यांचे आश्वसान दिले होते. संसदेत संमत झालेल्या विधेयकात याच आश्वासनांना मंजुरी देण्यात आली आहे. आता केवळ राजकीय कारणांमुळे काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष विरोध करत आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. काही लोकांचा फायद्यासाठी या विधेयकाला विरोध आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर टीका केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे झेंडे९० टक्के शेतकरी हे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप यासंदर्भात सत्य समोर आणत आहे. पंजाबमध्ये विधेयकाला विरोध होत असताना काँग्रेसचे झेंडे दिसून आले. भाजपा मतांसाठी निर्णय करत नाही. बिहारमध्ये याचा प्रभाव राहणार नाही कारण विधेयकातील तरतुदी तेथे अगोदरपासूनच लागू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीcongressकाँग्रेसMediaमाध्यमे