शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:07 IST

कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देविधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकास्त्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कुठेही बाजार मिळू शकतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले पीक विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला ८ टक्क्यांपर्यंत सेस द्यावा लागत होता. मात्र आता असे होणार नाही. आपले पीक कुठे व कितीमध्ये विकायचे याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतील. त्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात तत्कालीन आघाडी सरकारने २००६ मध्ये कॉन्टेक्ट फार्मिंगला परवानगी दिली होते. त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. काँग्रेसनेच खासगी कृषी बाजार समितीला परवानगी दिली होती. आज या बाजारांमध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जारी केलेल्या घोषणापत्रात काँग्रेसने कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय विक्रीला परवानगी देणे, शेतकऱ्यांना कुठेही विक्रीची परवानगी देणे यांचे आश्वसान दिले होते. संसदेत संमत झालेल्या विधेयकात याच आश्वासनांना मंजुरी देण्यात आली आहे. आता केवळ राजकीय कारणांमुळे काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष विरोध करत आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. काही लोकांचा फायद्यासाठी या विधेयकाला विरोध आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर टीका केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे झेंडे९० टक्के शेतकरी हे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप यासंदर्भात सत्य समोर आणत आहे. पंजाबमध्ये विधेयकाला विरोध होत असताना काँग्रेसचे झेंडे दिसून आले. भाजपा मतांसाठी निर्णय करत नाही. बिहारमध्ये याचा प्रभाव राहणार नाही कारण विधेयकातील तरतुदी तेथे अगोदरपासूनच लागू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीcongressकाँग्रेसMediaमाध्यमे