शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागातील फिरते आरोग्य पथक अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:50 IST

शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.

ठळक मुद्देगरोदर माता, बालकांच्या तपासणीवर परिणाम: अधिकृत पत्र न देताच डॉक्टरांना केले कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.औद्योगिक क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांना व मजुरांच्या कुटुंबीयांना ‘आरसीएच’ सेवा व लसीकरण सेवा पुरविण्यासाठी एकात्मिक जिल्हा आरोग्य सोसायटी नागपूरकडून मोबाईल मेडिकल युनिट २०१२ रोजी स्थापन करण्यात आले. एका आरोग्य पथकात एक महिला वैद्यकीय अधिकारी व एक आरोग्यसेविका असते. हे पथक गावोगावी भेट देण्यासह गरोदर माता, बालकांच्या आरोग्याची तपासणी करते. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून एक वाहन, औषधीसाठा व इतर साहित्य मिळते. २०१२ पासून ही आरोग्यसेवा निरंतर सुरू होती. पथकातील डॉक्टर मानधन तत्त्वावर कार्यरत असून, त्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार करावा लागतो. मिहान, वाडी व नरसाळा हे मोठे क्षेत्र आहे. येथील अंगणवाड्यांंना फिरते पथक भेट देऊन त्या त्या गावातील गरोदर माता व बालकांची तपासणी करते. मात्र, २०१९-२० च्या कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ही योजना प्रस्तावित करण्यात येणार नसल्याने शासनाने ही योजना बंद करण्यात यावी, असे पत्र १९ जानेवारी २०१९ रोजी काढले. मार्च २०१९ मध्ये जि.प.च्या आरोग्य विभागाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर संबंधितांना पत्र पाठविले. परंतु, अधिकृत पत्र वा कोणतीही सूचना न देता आरोग्य पथक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे समायोजन करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्तांना २७ मार्च २०१९ रोजी पत्र लिहिले; मात्र अद्यापही डॉक्टर व परिचारिकांचे समायोजन झाले नाही.वरिष्ठांच्या चुकीचा पथकातील डॉक्टरांना फटकाफिरते पथक सुरू झाले तेव्हापासून डॉक्टर व आरोग्यसेविका दर महिन्याला संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना कार्याचा अहवाल सादर करतात. हा अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना शासनाकडे पाठवावा लागतो. मात्र, आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी ‘डीएचओं’ना पत्र पाठवून योजनेचा भौतिक व आर्थिक अहवाल वारंवार सूचित करूनही आपल्या कार्यालयाकडून पाठविण्यात येत नसल्याचा ठपका ठेवून योजना बंद करावी, असे निर्देश दिले आहे. यावरून चूक वरिष्ठांची फटका मात्र पथकातील डॉक्टरांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले.शासनस्तरावर पथक बंद केलेपथक सुरू ठेवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र शासनस्तरावरूनच पथक बंद करण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे आठवडाभरात समायोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर