शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:57 IST

सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला.

ठळक मुद्देबंद घरी लोकांचा दिवसपुरुष मंडळींचा भाजी, किराणा आणण्यात होतो फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा काळ. सगळंच बदललंय. सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला. यात मोबाईल हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. याशिवाय कुणी कुटुंबासोबत लुडो, सापशिडीचा खेळ, अष्टाचौवा अशा खेळात रमले आहेत तर कुणी गाण्यांच्या भेंड्या खेळत आहेत. अनेकांना या दिवसात पुस्तकांची गोडी लागली आहे तर अनेकांसाठी टीव्ही जवळचा झाला आहे. अनेकांच्या कुटुंबात जुन्या आठवणींतून चर्चांना रंग चढत आहे. काहीजण इंटरनेटवरून खाद्यपदार्थांची रेसिपी बघून तो पदार्थ तयार करीत सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. या काळात किराणा, भाजी आणायची मुभा असल्याने तेवढीच एक फेरफटका मारण्याची संधी लोकांना मिळते आहे. बंदिस्त घरात राहण्याची वेळ आली असली तरी ही सर्व परिस्थिती सर्वांना आयुष्यभर लक्षात राहणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत लोकांशी संपर्क करून दिनचर्या विचारली असता प्रत्येक कुटुंबाच्या अनेक किस्से, कहाण्या समोर येत आहेत.पुस्तक, मोबाईल आणि झोपगांधीबाग निवासी मोनाली भोईटे यांनी लॉकडाऊनमध्ये चाललेल्या दिनचर्येविषयी सांगितले. आधी सकाळपासून आॅफिसला जायची घाई असायची. आता सर्वच थांबल्यासारख वाटते. वेळ असल्याने आईच्या कामात मदत करते. जेवणानंतर दुपारी थोडीशी झोप तर होतेच. यापूर्वी कधी अशी निवांत झोप मिळाली नव्हती. लॉकडाऊन लागणार याचा अंदाज आला होता त्यामुळे अनेक पुस्तकांची जुळवाजुळव केली होती. अनेक वर्षापासून पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नव्हती. आता पुस्तके वाचण्यात वेळ जात आहे. शिवाय आईबाबांशी गप्पाही होत आहेत. सायंकाळी मोबाईलवर मित्रांशी गप्पा होतात. घरच्या फुलझाडांना पाणी देण्याचे काम होते. त्यानंतर पुन्हा घरची स्वयंपाकाची कामे आणि जेवणानंतर थोडा मोबाईलवर वेळ घालविला की झोप जवळ येते.दिवसभर खेळ अन् बाबांचे नाटकांचे किस्सेश्रीकृष्णनगर येथील रागिणी वेणी म्हणाल्या, यापूर्वी इतका निवांत वेळ कधी मिळाला नव्हता. ना मुलांना आणि आम्हालाही नाही. सध्यातरी आॅफिसचे टेन्शन नाही. माझा मुलगा आणि आसपासच्या मुलांसोबत लुडो, सापसिडी तर कधी कॅरमचा खेळ चालतो. कधी तर गाण्याच्या भेंड्या रंगात येतात आणि आम्हीही त्यांच्यात सामील होतो. बाबा नाट्य कलावंत होते. त्यामुळे त्यांच्याकडे विविध नाटकांतले खूप सारे किस्से आहेत. त्यांचे किस्से ऐकण्यात बराच वेळ निघून जातो. मुलांचा चिवचिवाट चाललेला असतो. थोडे कंटाळवाणे वाटते पण हे दिवस निघून जातील. पुन्हा असा वेळ कधी मिळणार नाही. मात्र हा काळ खरोखरच आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस