शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:57 IST

सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला.

ठळक मुद्देबंद घरी लोकांचा दिवसपुरुष मंडळींचा भाजी, किराणा आणण्यात होतो फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा काळ. सगळंच बदललंय. सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला. यात मोबाईल हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. याशिवाय कुणी कुटुंबासोबत लुडो, सापशिडीचा खेळ, अष्टाचौवा अशा खेळात रमले आहेत तर कुणी गाण्यांच्या भेंड्या खेळत आहेत. अनेकांना या दिवसात पुस्तकांची गोडी लागली आहे तर अनेकांसाठी टीव्ही जवळचा झाला आहे. अनेकांच्या कुटुंबात जुन्या आठवणींतून चर्चांना रंग चढत आहे. काहीजण इंटरनेटवरून खाद्यपदार्थांची रेसिपी बघून तो पदार्थ तयार करीत सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. या काळात किराणा, भाजी आणायची मुभा असल्याने तेवढीच एक फेरफटका मारण्याची संधी लोकांना मिळते आहे. बंदिस्त घरात राहण्याची वेळ आली असली तरी ही सर्व परिस्थिती सर्वांना आयुष्यभर लक्षात राहणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत लोकांशी संपर्क करून दिनचर्या विचारली असता प्रत्येक कुटुंबाच्या अनेक किस्से, कहाण्या समोर येत आहेत.पुस्तक, मोबाईल आणि झोपगांधीबाग निवासी मोनाली भोईटे यांनी लॉकडाऊनमध्ये चाललेल्या दिनचर्येविषयी सांगितले. आधी सकाळपासून आॅफिसला जायची घाई असायची. आता सर्वच थांबल्यासारख वाटते. वेळ असल्याने आईच्या कामात मदत करते. जेवणानंतर दुपारी थोडीशी झोप तर होतेच. यापूर्वी कधी अशी निवांत झोप मिळाली नव्हती. लॉकडाऊन लागणार याचा अंदाज आला होता त्यामुळे अनेक पुस्तकांची जुळवाजुळव केली होती. अनेक वर्षापासून पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नव्हती. आता पुस्तके वाचण्यात वेळ जात आहे. शिवाय आईबाबांशी गप्पाही होत आहेत. सायंकाळी मोबाईलवर मित्रांशी गप्पा होतात. घरच्या फुलझाडांना पाणी देण्याचे काम होते. त्यानंतर पुन्हा घरची स्वयंपाकाची कामे आणि जेवणानंतर थोडा मोबाईलवर वेळ घालविला की झोप जवळ येते.दिवसभर खेळ अन् बाबांचे नाटकांचे किस्सेश्रीकृष्णनगर येथील रागिणी वेणी म्हणाल्या, यापूर्वी इतका निवांत वेळ कधी मिळाला नव्हता. ना मुलांना आणि आम्हालाही नाही. सध्यातरी आॅफिसचे टेन्शन नाही. माझा मुलगा आणि आसपासच्या मुलांसोबत लुडो, सापसिडी तर कधी कॅरमचा खेळ चालतो. कधी तर गाण्याच्या भेंड्या रंगात येतात आणि आम्हीही त्यांच्यात सामील होतो. बाबा नाट्य कलावंत होते. त्यामुळे त्यांच्याकडे विविध नाटकांतले खूप सारे किस्से आहेत. त्यांचे किस्से ऐकण्यात बराच वेळ निघून जातो. मुलांचा चिवचिवाट चाललेला असतो. थोडे कंटाळवाणे वाटते पण हे दिवस निघून जातील. पुन्हा असा वेळ कधी मिळणार नाही. मात्र हा काळ खरोखरच आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस