शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Winter Session Maharashtra: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नुसते बांबू लागवडीबाबत आवाहन नको; आमदार नीलेश राणेंची चौफेर फटकेबाजी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 17, 2024 18:14 IST

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मांडले लक्षवेधी मुद्दे 

नागपूर : सह्याद्री पट्ट्यात कोकणातील सर्वच भागात शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे. मात्र, बांबूचे कोंब खावून माकड व इतर जनावरांकडून नुकसानी केली जाते. त्यामुळे या रानटी जनावरांचा बंदोबस्त वनविभागाकडून केला जात नाही. परिणामी बांबू लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही. बांबू लागवड थांबली आहे. त्यामुळे सरकारने या विध्वंस करणाऱ्या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी कुडाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार नीलेश राणे यांनी केली.विधानसभा अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर बोलताना आमदार नीलेश राणे यांनी भाषणातील बहुतांश मुद्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.  नीलेश राणे म्हणाले, शासनाने बांबू लागवडीबाबत उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, बांबू लागवडीबाबत वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसती बांबू लागवड करा म्हणून आवाहन करताना कोकणातील विशेष करून कुडाळ तालुक्यातील माणगाव खार्यातील शेतकरी बांबू लागवडीपासून दूर चालला आहे. कारण बांबू लागवडीनंतर बांबूचे झाड मोठे झाल्यानंतर बांबूचा कोंबच माकड खावून नष्ट करतात त्यामुळे शेतकरी यांनी बांबूची शेती करणे सोडून दिले आहे.

वनविभाग काय करते ?सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक सरासरी ४ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बांबू लागवडसुद्धा मोठी आहे. मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणारी वनविभागाची यंत्रणा काय करते?, वनाधिकारी यांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करायला हवा. सरकारने वनविभागाच्या माध्यमातून जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. 

जपानप्रमाणे प्रगती साधली पाहिजेआपल्या राज्यात टुरीझम सेक्टर, manufacturing सेक्टरमध्ये भरीव काम करणे आवश्यक आहे. यातून नोकर्या निर्माण होवू शकतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे ३ लाख, ७ हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तर प्रगत जपान  या देशाचे ३ लाख, ७० हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यामुळे जपानने जशी प्रगती साधली तशी आपल्यालाही साधण्याची संधी आहे.

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरासरकारने २०१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर करून सुरू केले. मात्र जिल्हा रूग्णालय त्यात विलीन करून  एक ना धड भाराभर चिंध्या प्रमाणे आरोग्य विभागाची अवस्था झाली आहे. येथे व्यवस्थित कुठलेही उपचार मिळत नाहीत. कारण रिक्तपदांचा मोठा प्रश्न आहे. ५० टक्के व्यवस्थेवर सगळ सुरू आहे. ज्याठिकाणी १३० डॉक्टर हवे तेथे ३० डॉक्टर, १०८ क्लार्कच्या ठिकाणी ८ तर ४०० नर्सच्या ठिकाणी ३८ जण काम करतात मग गोरगरीबांना सेवा कशी मिळणार? असा प्रश्नच आहे.

पर्यटनामध्ये गुंतवणूक हवीकोकणाला सुंदर किनारपट्टी लाभली आहे. मात्र पायाभूत सुविधा नाहीत. पर्यटनामध्ये आपण मोठी गुंतवणूक करायला हवी. आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. आरोग्य, शिक्षण याप्रमाणे पर्यटनाला महत्व दिले पाहिजे.

सीआरझेडभध्ये शिथिलता हवीमालवणमधील देवबाग किनारपट्टी जागतिक दर्जाची आहे. मात्र, सीआरझेडच्या अडचणीमुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणेदेखील कठीण बनले आहे. येथील जमीन समुद्र गिळंकृत करत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सीआरझेडमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

राजकोट घटनेची सखोल चौकशी करामालवण येथील राजकोट किल्ला दुर्घटना प्रकरणी माजी आमदार घटनास्थळी पंधरा मिनिटात कसे पोहोचले ? त्या घटनेदरम्यानचे माजी आमदार आणि सहकार्यांचे सिडीआर चेक करा अशी आपली पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. आज सभागृहात हा विषय पुन्हा आल्याने आपण चौकशीच्या त्याच मागणीवर ठाम आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNilesh Raneनिलेश राणे forest departmentवनविभागFarmerशेतकरीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज