शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नुसते बांबू लागवडीबाबत आवाहन नको; आमदार नीलेश राणेंची चौफेर फटकेबाजी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 17, 2024 18:14 IST

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मांडले लक्षवेधी मुद्दे 

नागपूर : सह्याद्री पट्ट्यात कोकणातील सर्वच भागात शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे. मात्र, बांबूचे कोंब खावून माकड व इतर जनावरांकडून नुकसानी केली जाते. त्यामुळे या रानटी जनावरांचा बंदोबस्त वनविभागाकडून केला जात नाही. परिणामी बांबू लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही. बांबू लागवड थांबली आहे. त्यामुळे सरकारने या विध्वंस करणाऱ्या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी कुडाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार नीलेश राणे यांनी केली.विधानसभा अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर बोलताना आमदार नीलेश राणे यांनी भाषणातील बहुतांश मुद्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.  नीलेश राणे म्हणाले, शासनाने बांबू लागवडीबाबत उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, बांबू लागवडीबाबत वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसती बांबू लागवड करा म्हणून आवाहन करताना कोकणातील विशेष करून कुडाळ तालुक्यातील माणगाव खार्यातील शेतकरी बांबू लागवडीपासून दूर चालला आहे. कारण बांबू लागवडीनंतर बांबूचे झाड मोठे झाल्यानंतर बांबूचा कोंबच माकड खावून नष्ट करतात त्यामुळे शेतकरी यांनी बांबूची शेती करणे सोडून दिले आहे.

वनविभाग काय करते ?सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक सरासरी ४ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बांबू लागवडसुद्धा मोठी आहे. मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणारी वनविभागाची यंत्रणा काय करते?, वनाधिकारी यांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करायला हवा. सरकारने वनविभागाच्या माध्यमातून जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. 

जपानप्रमाणे प्रगती साधली पाहिजेआपल्या राज्यात टुरीझम सेक्टर, manufacturing सेक्टरमध्ये भरीव काम करणे आवश्यक आहे. यातून नोकर्या निर्माण होवू शकतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे ३ लाख, ७ हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तर प्रगत जपान  या देशाचे ३ लाख, ७० हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यामुळे जपानने जशी प्रगती साधली तशी आपल्यालाही साधण्याची संधी आहे.

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरासरकारने २०१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर करून सुरू केले. मात्र जिल्हा रूग्णालय त्यात विलीन करून  एक ना धड भाराभर चिंध्या प्रमाणे आरोग्य विभागाची अवस्था झाली आहे. येथे व्यवस्थित कुठलेही उपचार मिळत नाहीत. कारण रिक्तपदांचा मोठा प्रश्न आहे. ५० टक्के व्यवस्थेवर सगळ सुरू आहे. ज्याठिकाणी १३० डॉक्टर हवे तेथे ३० डॉक्टर, १०८ क्लार्कच्या ठिकाणी ८ तर ४०० नर्सच्या ठिकाणी ३८ जण काम करतात मग गोरगरीबांना सेवा कशी मिळणार? असा प्रश्नच आहे.

पर्यटनामध्ये गुंतवणूक हवीकोकणाला सुंदर किनारपट्टी लाभली आहे. मात्र पायाभूत सुविधा नाहीत. पर्यटनामध्ये आपण मोठी गुंतवणूक करायला हवी. आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. आरोग्य, शिक्षण याप्रमाणे पर्यटनाला महत्व दिले पाहिजे.

सीआरझेडभध्ये शिथिलता हवीमालवणमधील देवबाग किनारपट्टी जागतिक दर्जाची आहे. मात्र, सीआरझेडच्या अडचणीमुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणेदेखील कठीण बनले आहे. येथील जमीन समुद्र गिळंकृत करत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सीआरझेडमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

राजकोट घटनेची सखोल चौकशी करामालवण येथील राजकोट किल्ला दुर्घटना प्रकरणी माजी आमदार घटनास्थळी पंधरा मिनिटात कसे पोहोचले ? त्या घटनेदरम्यानचे माजी आमदार आणि सहकार्यांचे सिडीआर चेक करा अशी आपली पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. आज सभागृहात हा विषय पुन्हा आल्याने आपण चौकशीच्या त्याच मागणीवर ठाम आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNilesh Raneनिलेश राणे forest departmentवनविभागFarmerशेतकरीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज