शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘एमकेसीएल’च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना; विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 17:59 IST

कुलगुरूंनी स्वत: ‘एमकेसीएल’ची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ कामाचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे.

ठळक मुद्देपरीक्षा अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एकदा हाकलूनदेखील परत काम देण्यात आलेल्या ‘एमकेसीएल’च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना बसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महाविद्यालयांना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नागपूर विद्यापीठाने काही वर्षांअगोदर ‘एमकेसीएल’ला बाहेरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू असताना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हट्टापोटी त्याच कंपनीला विद्यापीठात परत आणण्यात आले. कुलगुरूंनी स्वत: ‘एमकेसीएल’ची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ कामाचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे.

२५ एप्रिलपासून उन्हाळी परीक्षा सुरू होणार असताना अनेक महाविद्यालयांना अर्ज भरताच आले नव्हते. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली होती. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते. दरम्यान, विद्यापीठाचे संकेतस्थळ सुरू न झाल्याने अर्ज जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, या अडचणी दूर न झाल्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत अगोदर ३१ मार्च व नंतर ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत आणखी वाढविण्यात आली आहे.

विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करीत आहे की केवळ एका कंपनीला महसूल मिळावा यासाठी काम सुरू आहे, असा सवाल संतप्त प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाStudentविद्यार्थी