शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

चूक ‘डीटीई’ची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:03 IST

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.‘आॅनलाईन’ प्रक्रियेतील अडथळ्यांंमुळे प्रवेशाच्या वेळी अनेकांना दोन ते तीनदा शुल्क भरावे लागले होते. मात्र भरलेले हे अतिरिक्त शुल्क अद्यापही परत मिळालेले ...

ठळक मुद्दे‘आॅनलाईन’ शुल्क प्रणालीचा खेळखंडोबा : प्रवेशाच्या वेळी भरले दोन ते तीनदा शुल्क

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.‘आॅनलाईन’ प्रक्रियेतील अडथळ्यांंमुळे प्रवेशाच्या वेळी अनेकांना दोन ते तीनदा शुल्क भरावे लागले होते. मात्र भरलेले हे अतिरिक्त शुल्क अद्यापही परत मिळालेले नाही. ‘डीटीई’ची (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) चूक असताना आम्ही भुर्दंड सहन का करायचा असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘डीटीई’तर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया ३ आॅगस्टपर्यंत चालली. १० आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचे होते. ‘कॅप’च्या तीन व अतिरिक्त अशा मिळून एकूण चार फेºयांमध्ये ही प्रक्रिया चालली. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी पाच हजारांचे प्रवेश स्वीकृती शुल्क भरणे अनिवार्य होते.या शुल्काचा भरणा करण्यासाठी ‘आॅनलाईन’ प्रणाली किंवा ‘डीडी’ (डिमांड ड्राफ्ट) असे पर्याय देण्यात आले होते.अनेक पालकांनी प्रवेश स्वीकृती शुल्क हे ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरण्याचा पर्याय निवडला व संबंधित शुल्क भरण्याची प्रक्रिया केली. बँकेच्या खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश तर आला. मात्र ‘डीटीई’च्या खात्यात प्रत्यक्षात त्या दिवशी पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे मग अनेकांनी पायपीट करून बँकांमधून त्या रकमेचा ‘डीडी’ तयार करून आणला व तो सादर करून प्रवेश निश्चिती केली. अगोदर खात्यातून वजा झालेले पैसे ‘रिफंड’ होतील अशी अपेक्षा होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे असे काहीच न होता प्रत्यक्षात हे पैसे दोन ते तीन दिवसांनंतर ‘डीटीई’च्या बँक खात्यामध्ये जमा झाले.असा प्रकार झाला तर काही दिवसातच पैसे परत विद्यार्थी, पालक अथवा संबंधितांच्या खात्यात वळते होतील, असे ‘डीटीई’ने संकेतस्थळावर स्पष्ट केले होते.मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. अनेकांनी तर ३० जूनला अशा पद्धतीने शुल्क भरले होते. मात्र जवळपास तीन महिने होऊनदेखील याबाबतीत काहीच दिलासा मिळालेला नाही.दोन ते तीनदा पैसे झाले वजाएकदा ‘आॅनलाईन’ प्रणालीने ‘डीटीई’च्या खात्यात प्रवेश निश्चिती शुल्क जमा न झाल्याने काही विद्यार्थी-पालकांनी दोन ते तीन वेळा प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यातून पैसे वजा होत गेले. मात्र प्रत्यक्षात ‘डीटीई’च्या खात्यात त्या दिवशी वळते झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने ‘डीडी’ काढून द्यावा लागला व दुप्पट ते तीनपट फटका सहन करावा लागला. यासंदर्भात मुख्यालयाला ‘ई-मेल’ पाठवूनदेखील काहीही झालेले नाही, असे काही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.मुख्यालयाकडे केली विनंतीयासंदर्भात ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता, यासंदर्भातील तक्रारी आल्याचे त्यांनी मान्य केले. तांत्रिक कारणांमुळे काही पालकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागले. मात्र त्यांचा परतावा ‘डीटीई’कडून निश्चितपणे करण्यात येईल. याबाबतीत मुख्यालयाकडे विनंती अर्ज पाठविला असून लवकरच यासंदर्भात तेथून पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.