शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चूक ‘डीटीई’ची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:03 IST

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.‘आॅनलाईन’ प्रक्रियेतील अडथळ्यांंमुळे प्रवेशाच्या वेळी अनेकांना दोन ते तीनदा शुल्क भरावे लागले होते. मात्र भरलेले हे अतिरिक्त शुल्क अद्यापही परत मिळालेले ...

ठळक मुद्दे‘आॅनलाईन’ शुल्क प्रणालीचा खेळखंडोबा : प्रवेशाच्या वेळी भरले दोन ते तीनदा शुल्क

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.‘आॅनलाईन’ प्रक्रियेतील अडथळ्यांंमुळे प्रवेशाच्या वेळी अनेकांना दोन ते तीनदा शुल्क भरावे लागले होते. मात्र भरलेले हे अतिरिक्त शुल्क अद्यापही परत मिळालेले नाही. ‘डीटीई’ची (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) चूक असताना आम्ही भुर्दंड सहन का करायचा असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘डीटीई’तर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया ३ आॅगस्टपर्यंत चालली. १० आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचे होते. ‘कॅप’च्या तीन व अतिरिक्त अशा मिळून एकूण चार फेºयांमध्ये ही प्रक्रिया चालली. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी पाच हजारांचे प्रवेश स्वीकृती शुल्क भरणे अनिवार्य होते.या शुल्काचा भरणा करण्यासाठी ‘आॅनलाईन’ प्रणाली किंवा ‘डीडी’ (डिमांड ड्राफ्ट) असे पर्याय देण्यात आले होते.अनेक पालकांनी प्रवेश स्वीकृती शुल्क हे ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरण्याचा पर्याय निवडला व संबंधित शुल्क भरण्याची प्रक्रिया केली. बँकेच्या खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश तर आला. मात्र ‘डीटीई’च्या खात्यात प्रत्यक्षात त्या दिवशी पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे मग अनेकांनी पायपीट करून बँकांमधून त्या रकमेचा ‘डीडी’ तयार करून आणला व तो सादर करून प्रवेश निश्चिती केली. अगोदर खात्यातून वजा झालेले पैसे ‘रिफंड’ होतील अशी अपेक्षा होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे असे काहीच न होता प्रत्यक्षात हे पैसे दोन ते तीन दिवसांनंतर ‘डीटीई’च्या बँक खात्यामध्ये जमा झाले.असा प्रकार झाला तर काही दिवसातच पैसे परत विद्यार्थी, पालक अथवा संबंधितांच्या खात्यात वळते होतील, असे ‘डीटीई’ने संकेतस्थळावर स्पष्ट केले होते.मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. अनेकांनी तर ३० जूनला अशा पद्धतीने शुल्क भरले होते. मात्र जवळपास तीन महिने होऊनदेखील याबाबतीत काहीच दिलासा मिळालेला नाही.दोन ते तीनदा पैसे झाले वजाएकदा ‘आॅनलाईन’ प्रणालीने ‘डीटीई’च्या खात्यात प्रवेश निश्चिती शुल्क जमा न झाल्याने काही विद्यार्थी-पालकांनी दोन ते तीन वेळा प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यातून पैसे वजा होत गेले. मात्र प्रत्यक्षात ‘डीटीई’च्या खात्यात त्या दिवशी वळते झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने ‘डीडी’ काढून द्यावा लागला व दुप्पट ते तीनपट फटका सहन करावा लागला. यासंदर्भात मुख्यालयाला ‘ई-मेल’ पाठवूनदेखील काहीही झालेले नाही, असे काही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.मुख्यालयाकडे केली विनंतीयासंदर्भात ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता, यासंदर्भातील तक्रारी आल्याचे त्यांनी मान्य केले. तांत्रिक कारणांमुळे काही पालकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागले. मात्र त्यांचा परतावा ‘डीटीई’कडून निश्चितपणे करण्यात येईल. याबाबतीत मुख्यालयाकडे विनंती अर्ज पाठविला असून लवकरच यासंदर्भात तेथून पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.