शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात ‘मिशन बिगीन अगेन’ जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:19 IST

लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग घटकात काम सुरू झाले असून ४३ हजारांहून अधिक कामगार रुजूदेखील झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग घटकात काम सुरू झाले असून ४३ हजारांहून अधिक कामगार रुजूदेखील झाले आहेत.लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. चौथ्या लॉकडाऊनमध्ये खबरदारी घेत टप्याटप्याने एक एक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील लहान मोठे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी २ हजार १७९ उद्योग घटकात प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. यात हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर, बुटीबोरी एमआयडीसी, मौदा, बाजारगाव, रामटेक, कोंढाळी येथील अनेक मोठ्या उद्योगांचादेखील समावेश आहे. सद्यस्थितीत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळता कुठेही उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.पहिल्या चरणात अन्न, औषध उद्योगांना परवानगीलॉकडाऊन अंतर्गत प्रथम चरणात राईस मिल, दाल मिल,अन्न प्रक्रिया उद्योग, औषध निर्मिती, खत व बियाणे प्रक्रिया इत्यादी अत्यावश्यक उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात २३० उद्योगात उत्पादन सुरू होते.रोजगार संधी वाढलीकोरोनामुळे औद्योगिक व इतर व्यवसायिक आस्थापनामध्ये काम करणारे परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात परत गेले. आता उद्योग परत सुरू झाले असल्यामुळे रोजगाराची संधी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे. कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर उद्योग घटकांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना आवश्यक असणाऱ्या कामगारांची मागणी त्या ठिकाणी नोंदविली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची चमू तयार करण्यात आली आहे. ही चमू प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देऊन त्यांची मागणी पोर्टलवर नोंदवित आहे.उद्योजकांना पुरवणार मनुष्यबळउद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या मार्फत पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योग घटकांनी आपली कामगारांची मागणी पोर्टलवर नोंदवावी. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे.-अ. प्र. धर्माधिकारी,उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग

टॅग्स :nagpurनागपूरLabourकामगार