शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 11:18 IST

मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर बोगस संदेशटीए बटालियनमध्ये भरती असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली व्हायरल झालेल्या संदेशात टीए बटालियन नागपूरमध्ये भरती होणार असल्याचे म्हटले आहे. संदेशात शैक्षणिक पात्रता व शारीरिक मापदंडाची माहिती व तारीखही देण्यात आल्याने युवकांची दिशाभूल सुरू आहे. यामुळे सेनाधिकारी सतर्क झाले आहेत.अलिकडेच १८ फेब्रुवारीला असा संदेश सोशल मीडियावरून पुन्हा व्हायरल झाला. यात जीडी (जनरल ड्यूटी) व ट्रेडमन पदााठी २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत नागपुरात भरती होणार असल्याचे म्हटले आहे. जीडीची २१३ पदे व ट्रेडमनची ६३ पदांच्या या जाहिरातीत शारीरिक पात्रता व आवश्यक दस्तावेजाची माहिती देण्यात आली आहे. जाहिरातीअखेर एका महिलेचे छायाचित्र देण्यात आले असून सुरेखा म. पाटील, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक २७ असा परिचय देण्यात आला आहे. हा संदेश वाचल्यावर अनेकजण चौकशीसाठी नागपुरात पोहचले. रेल्वे स्टेशनजवळील एआरओ कार्यालयातही चौकशी केली. या खोट्या जाहिरातीमुळे सीताबर्डी किल्ल्यापुढे अनेक उमेदवार जमले होते. या पार्श्वभूमीवर रक्षा मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी अशा प्रकारची कोणतीही भरती प्रकिया नसल्याचे स्पष्ट केले आहे. टी ए ची भरती सेना भरती कार्यालयाकडूनच केली जाते. त्याची जाहिरात वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.हा कटकारस्थानाचा भाग तर नव्हे?बटालियनमधील भरतीचा संदेश वारंवार व्हायरल करण्यामागे हा एखाद्या कटकारस्थानाचा भाग तर नव्हे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा एक संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरातून शेकडो युवक नागपुरातील एआरओ कार्यालयात पोहचले होते. प्रकार खोटा असल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र समजूत घालून सर्वांना परत पाठविण्यात आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्याने शंका उपस्थित होत आहे.

नागपुरात टीए बटालियन नाहीनागपुरात पूर्वी टीए बटालियनचे कार्यालय होते. येथून सैन्यासाठी भरती प्रक्रियाही राबविली जात असे. याची अधिकृत माहिती विविध प्रसार माध्यमातून दिली जात असे. मात्र चार महिन्यांपूर्वी नागपुरातून टीए बटालियन स्थानांतरित झाली आहे. मात्र नागपूरसह देशातील अनेक युवकांना याची कल्पना नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हा संदेश खरा समजून बेरोजगार युवक भरतीसाठी नागपुरात पोहचत आहेत.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग