शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 11:18 IST

मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर बोगस संदेशटीए बटालियनमध्ये भरती असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली व्हायरल झालेल्या संदेशात टीए बटालियन नागपूरमध्ये भरती होणार असल्याचे म्हटले आहे. संदेशात शैक्षणिक पात्रता व शारीरिक मापदंडाची माहिती व तारीखही देण्यात आल्याने युवकांची दिशाभूल सुरू आहे. यामुळे सेनाधिकारी सतर्क झाले आहेत.अलिकडेच १८ फेब्रुवारीला असा संदेश सोशल मीडियावरून पुन्हा व्हायरल झाला. यात जीडी (जनरल ड्यूटी) व ट्रेडमन पदााठी २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत नागपुरात भरती होणार असल्याचे म्हटले आहे. जीडीची २१३ पदे व ट्रेडमनची ६३ पदांच्या या जाहिरातीत शारीरिक पात्रता व आवश्यक दस्तावेजाची माहिती देण्यात आली आहे. जाहिरातीअखेर एका महिलेचे छायाचित्र देण्यात आले असून सुरेखा म. पाटील, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक २७ असा परिचय देण्यात आला आहे. हा संदेश वाचल्यावर अनेकजण चौकशीसाठी नागपुरात पोहचले. रेल्वे स्टेशनजवळील एआरओ कार्यालयातही चौकशी केली. या खोट्या जाहिरातीमुळे सीताबर्डी किल्ल्यापुढे अनेक उमेदवार जमले होते. या पार्श्वभूमीवर रक्षा मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी अशा प्रकारची कोणतीही भरती प्रकिया नसल्याचे स्पष्ट केले आहे. टी ए ची भरती सेना भरती कार्यालयाकडूनच केली जाते. त्याची जाहिरात वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.हा कटकारस्थानाचा भाग तर नव्हे?बटालियनमधील भरतीचा संदेश वारंवार व्हायरल करण्यामागे हा एखाद्या कटकारस्थानाचा भाग तर नव्हे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा एक संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरातून शेकडो युवक नागपुरातील एआरओ कार्यालयात पोहचले होते. प्रकार खोटा असल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र समजूत घालून सर्वांना परत पाठविण्यात आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्याने शंका उपस्थित होत आहे.

नागपुरात टीए बटालियन नाहीनागपुरात पूर्वी टीए बटालियनचे कार्यालय होते. येथून सैन्यासाठी भरती प्रक्रियाही राबविली जात असे. याची अधिकृत माहिती विविध प्रसार माध्यमातून दिली जात असे. मात्र चार महिन्यांपूर्वी नागपुरातून टीए बटालियन स्थानांतरित झाली आहे. मात्र नागपूरसह देशातील अनेक युवकांना याची कल्पना नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हा संदेश खरा समजून बेरोजगार युवक भरतीसाठी नागपुरात पोहचत आहेत.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग