शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वीटभट्टी मजुरांचे दयनीय जगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:05 IST

तप्त उन्हाळा वीटभट्टीसाठी सुगीचा असतो. कारण याच तापाने ओल्या विटा पक्क्या होऊन घर बांधणीस उपयुक्त होतात; मात्र यावर्षी असे नाही. सूर्य तापतो आहे पण वीटभट्ट्यांचे काम थंड पडले आहे.

निशांत वानखेडेनागपूर : मार्च महिना सुरू झाला की हळूहळू आकाशात सूर्य तापायला लागतो. पुढे एप्रिल, मे महिन्यात अंगाची लाही लाही करणारे हे ऊन प्रत्येकाला नकोसे असते. मात्र हाच तप्त उन्हाळा वीटभट्टीसाठी सुगीचा असतो. कारण याच तापाने ओल्या विटा पक्क्या होऊन घर बांधणीस उपयुक्त होतात; मात्र यावर्षी असे नाही. सूर्य तापतो आहे पण वीटभट्ट्यांचे काम थंड पडले आहे. कोरोनाने सर्व हिरावले आहे आणि या परिस्थितीत वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या चुलीही थंड पडल्या आहेत.नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसीलच्या केवठा गावात तलावाकाठी शेतात लागणाºया वीटभट्ट्यांची कामे थांबलेली आहेत. खोदून एका ठिकाणी जमा केलेले काळ्या रेतवट मातीचे ढिगारे व त्यात मिक्स करण्यासाठी खापरखेडा औष्णिक वीजकेंद्रावरून आणलेले राखेचे ढिगारे एका बाजूला नुसतेच पडून आहेत. अशा विदारक वातावरणात भट्ट्यांवर कामासाठी आलेले कामगार खिन्न मनाने बसले आहेत. जेमतेम विटा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. होळीला मजूर गावी गेले; मात्र परतल्यावर काम सुरळीत सुरू होण्यापूर्वी कोरोनाने थैमान घातले आणि टाळेबंदीत काम ठप्प झाले.दोन व्यक्ती दिवसाला १००० ते १५०० विटा बनवितात. हजार विटांचे ७०० रुपये मिळतात. त्यातून एका मजुराची ३५० ते ५०० रुपयांपर्यंत रोजी पडते. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीटनिर्मितीचे काम चालते. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडपासून मजूर कामाला येतात आणि भट्टीच्या आसपास झोपड्या करून राहतात; मात्र दोन महिन्यांपासून विटा बनविण्यापासून विक्रीला नेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया बंद असल्याने सर्व मजूर डोक्यावर हात ठेवून बसले आहेत.केवठा भट्टीवरील मजूर राहील रामटेके याने सांगितले, होळीनंतर आम्ही इकडे आलो होतो. थोडे काम झाले आणि बंद पडले. काम बंद झाल्याने काही मजूर पायपीट करीत गावाकडे परतले. त्यांच्यासोबत आता १६ मजूर काम सुरू होण्याच्या आशेवर थांबले आहेत. मालकाने कुटुंबाला हजार - हजार रुपये दिले. एवढ्या पैशात काय होईल आणि काय घेऊन गावाकडे जाऊ, ही व्यथा त्यांनी व्यक्त केली. अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो मजूर थांबले आहेत. वीटभट्टी मालक मंगेश गोंडाने यांनीही हतबलता मांडली. अर्धवट माल पडला आहे, कामात पैसे थकले आहेत, मग मजुरांना काय देणार, हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.

खायला दाणा नाही आणि खिशात पैसे नाहीतविविध ठिकाणांवरून आलेल्या या मजुरांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खायला दाणा नाही आणि खिशात पैसे नाहीत. आशा अवस्थेत दिवस काढत आहेत. त्यांची अवस्था बघायला गेलेल्या संघर्षवाहिनी आणि दुर्बल समाज विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मजूर कुटुंबांना धान्य दिले. दीनानाथ वाघमारे, मुकुंद आदेवार, धीरज भिसीकर, सचिन लोणकर आदी कार्यकर्ते सातत्याने अशा निराधार लोकांच्या मदतीला धावत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस