शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्य शासनाकडून शाळांची दिशाभूल; राज्याच्या तिजोरीत आरटीईचा पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 07:00 IST

Education Nagpur News केंद्र सरकारकडून राज्याला प्रति विद्यार्थी २६,९०८ रुपये फी रूपात वर्षाला मिळत आहे, तर राज्य सरकार शाळांना १७,६७० रुपये प्रति विद्यार्थी शाळांना देत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून शाळा प्रतिपूर्तीच्या प्रतीक्षेत

मंगेश व्यवहारे

नागपूर : राज्य सरकार आरटीईच्या प्रतिपूर्ती वितरणात शाळांची दिशाभूल करीत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला प्रति विद्यार्थी २६,९०८ रुपये फी रूपात वर्षाला मिळत आहे, तर राज्य सरकार शाळांना १७,६७० रुपये प्रति विद्यार्थी शाळांना देत आहे. विशेष म्हणजे आरटीईमध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा आहे. पण राज्य सरकार एक दमडीचाही वाटा आरटीईमध्ये देत नाही. त्यातच केंद्राकडून निधी मिळूनही राज्य सरकार शाळांना वितरणही करीत नाही. गेल्या तीन वर्षापासून शाळांना आरटीईची प्रतिपूर्ती मिळालेली नाही.

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांसाठी नामांकित शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात. त्या मोबदल्यात केंद्र व राज्य सरकार मिळून शाळांना प्रति विद्यार्थी शैक्षणिक शुल्क देते. राज्यात २०१२ पासून आरटीईची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी ९ हजारावर शाळेत १ लाख १५ हजारावर जागा आरटीईत आरक्षित करण्यात आल्या आहेत. या योजनेत राज्य सरकार सुरुवातीपासून केंद्र सरकारची व राज्यातील शाळांची दिशाभूल करीत आले आहे. केंद्र सरकारकडून आरटीईचा निधी राज्याला मिळूनही राज्य सरकारने तीन वर्षापासून शाळांना वाटप केला नाही. नागपूर विभागातील काही शाळा संचालकांनी आरटीई फाऊंडेशनची स्थापना करून माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून राज्य सरकार शाळांची फसगत करीत असल्याचे उघडकीस आणले आहे.

 अशी केली दिशाभूल

१) केंद्र सरकारने २०१८-१९ व २०१९-२० या वर्षासाठी आरटीईचा प्रति विद्यार्थी २६,९०८ रुपये दरानुसार राज्याला निधी दिला. त्याचबरोबर नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११०० रुपये व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १४०० रुपये गणवेशाचे दिले. पण राज्यसरकारने शाळांना प्रति विद्यार्थी दर १७,६७० रुपये निश्चित केला आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा त्यात उल्लेखच नाही.

२) केंद्र सरकारने राज्याला २०१७-१८ मध्ये ६४२.३२ कोटी, २०१८-१९ मध्ये ६८३.७३ कोटी व २०१९-२० मध्ये ६२६.३० कोटी रुपये नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिले. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ मध्ये ९९.६९ कोटी, २०१८-१९ मध्ये १०४.२ कोटी व २०१९-२० मध्ये ८६.८३ कोटी दिले. हा निधी राज्याच्या तिजोरीत जमा असताना, राज्य सरकारने शाळांना २०१७-१८ मध्ये ५० टक्के, २०१८-१९ मध्ये २८ टक्के निधीचे वितरण केले, तर २०१९-२० मध्ये एक रुपयाही दिला नाही.

 गेल्या तीन वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून आम्ही आरटीईच्या थकीत प्रतिपूर्तीसाठी पाठपुरावा करीत आहो. सरकारच्या तिजोरीत आरटीईचा निधी जमा असतानाही, राज्य सरकारने ठरविलेल्या दरानुसारही शाळांना निधी दिला नाही. कोरोनामुळे सध्या शाळांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे आरटीईची थकीत प्रतिपूर्ती लगेच द्यावी, अशी आमची मागणी आहे.

सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाऊंडेशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र