शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:22 IST

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली.

ठळक मुद्देवाहनांची तोडफोड, गोंधळपरिसरात प्रचंड दहशत, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली. हे पाच ते सात गुंड तब्बल अर्धा तास दहशत पसरवत असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले होते.सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कमाल चौक परिसरात गुन्हेगारांच्या दोन गटाचा आधी वाद झाला. एकाची कार अडवून दुस-या गटाने मारहाण केल्यानंतर मारहाणीचा बदला घेण्यासाठी पाच ते सात गुंड यशोधरानगर परिसरात पोहचले. त्यांनी पंचवटीनगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, गुरुवारी बाजार परिसरात प्रचंड आरडाओरड आणि शिवीगाळ करीत ३० ते ४० गाड्यांची तोडफोड केली. गुंडांचे हे टोळके दारूच्या नशेत टून्न होते. त्यांचा अविर्भाव पाहून परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आले. हिम्मत करून काहींनी आरडाओरड केली. तर काहींनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे धावला. दरम्यान, आरोपी पळून गेल्यानंतर या भागातील नागरिक एकत्र झाले. तोवर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येत यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात पोहचले. त्यांनी नागरिकांची कशीबशी समजूत काढून त्यांना परत पाठविले. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींची शोधाशोध केली. शुक्रवारी दुपारपर्यंत चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची ‘चौकशी’ सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी