शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही ...

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही सुरू झाल्या आहेत. ९ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी सुरू झाल्या आहेत; पण बोर्डाच्या परीक्षेबाबत कुठलेही नियोजन नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात आहेत. दुसरीकडे सीबीएसई बोर्डाने परीक्षेच्या तारखेबरोबरच निकालाचीही तारीख घोषित केली आहे; पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेबाबत कुठलीही घोषणा केली नाही.

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु परीक्षा कधी होणार, अभ्यासक्रम किती असणार, पेपर पॅटर्न कोणता असणार, तोंडी व लेखी गुणांचे प्रमाण काय असणार, अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे मूल्यमापन गुणदान किती व कसे असणार, परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन होणार, गुणदान तक्त्याचे नियोजन कसे असणार, हे प्रश्न आता भेडसावत आहेत.

आणखी अभ्यासक्रम कमी करणार आहे की नाही, परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावली की जुन्याच पद्धतीची प्रश्नपत्रिका राहणार, त्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण होणार किंवा नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात असल्याने संपूर्ण शिक्षणक्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाची स्थिती आहे.

राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी नागपूर विभागातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे या विषयाकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

- संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा संभ्रम दूर करून दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चित करून स्वयंस्पष्ट दिशा-निर्देश तत्काळ निर्गमित करावे. पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा.

- अनिल शिवणकर, शिक्षक

- दहा महिन्यांनंतर आता वर्ग ९ ते १२ च्या प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांंचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असला तरी शासनाकडून अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, परीक्षा पद्धती, मूल्यमापन याबाबतचे निश्चित धोरण नाही.

-दिलीप तडस, उपमुख्याध्यापक, विदर्भ बुनियादी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय