शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

नागपूर : गणेशोत्सवात मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढतात, असा अनुभव आहे. यंदा दूध, साखर, खोवा, काजू, रंग ...

नागपूर : गणेशोत्सवात मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढतात, असा अनुभव आहे. यंदा दूध, साखर, खोवा, काजू, रंग या कच्च्या मालाच्या दरात फारशी वाढ न होताही विक्रेत्यांनी दर वाढविले आहेत. त्याचा फटका गरीब आणि सर्वसामान्यांना बसत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव कोरोना नियमांतर्गत साजरा करण्यात येत असतानाही प्रत्येक घरी दरदिवशी पाव, अर्धा वा किलो मोदक पेढे व अन्य मिठाई खरेदी केली जाते. त्याचा फायदा विक्रेते घेतात. दरवाढीवर नियंत्रण कुणाचे आणि किती विक्रेत्यांवर भेसळीची कारवाई होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एफडीए कायद्यानुसार विक्रेत्याला मिठाईच्या ट्रेवर ‘बेस्ट बिफोर’ अर्थात मिठाईचे उत्पादन आणि एक्स्पायरी तारीख लिहावी लागते. काही विक्रेत्यांकडे मिठाईवर तारखेचा उल्लेख नसतोच. अशा विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने विक्रेते तारीख गेल्यानंतरची मिठाईची विक्री करतात. त्या ग्राहकांची फसवणूक होते. अशा विक्रेत्यांवर भेसळ कायद्यांतर्गत कारवाई करून दंड वसूल करावा आणि दुकाने सील करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे.

मिठाईचे दर (प्रति किलो)

मिठाईसध्याचा दर गणेशोत्सवाआधी

पेढे ५८० ५२०

बर्फी ६०० ५४०

गुलाबजामून १२० १००

काजू कतली ७४० ७००

मोतीचूर लाडू २८० २४०

का दर वाढले?

नंदनवन भागातील स्वीट मार्ट चालक म्हणाले, खोवा, दूध, काजूचे दर, कारागिरी आणि विजेचे दर वाढल्यामुळेच मिठाईची दरवाढ झाली आहे. मिठाई नेहमीच थंड जागेत ठेवावी लागते. दूध आणि खोव्याची मिठाई जास्त दिवस टिकत नाही. थोडाफार नफा घेऊन मिठाईची विक्री करतो.

वर्धा रोडवरील हॉटेलचालक म्हणाले, कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरच दरवाढ करतो. सध्या दुधासह सर्वच कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. कारागिरी दुप्पट झाली आहे. नफा मिळत असेल तरच मिठाईची विक्री करण्यात अर्थ आहे. गणेशोत्सवात पेढ्याला, मोदकला मागणी असते.

भेसळीकडे लक्ष असू द्या :

धार्मिक उत्सवात लोकांचा मिठाई खरेदीकडे जास्त कल असतो. काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. ग्राहकही खरेदी करताना जागरूकतेने लक्ष देत नसल्याने विक्रेत्यांचे फावते. अन्न प्रशासन विभागाकडे पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे शहरात बहुतांश परिसरात कारवाई होत नाही. त्यामुळे लोकांनीच भेसळीकडे जागरूकतेने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्राहक म्हणतात :

उत्सवात लोकांनी मिठाई जागरूकतेने खरेदी करावी. गणेशाला नैवेद्यासाठी पेढ्याचे मोदक खरेदी करावे लागतात. मिठाई नेहमीच्या हॉटेलमधून खरेदी करतो. त्यामुळे भेसळीचा प्रश्नच येत नाही. पण खरेदीवेळी लोकांनी दक्ष असावे.

महेंद्र आदमने, ग्राहक

मिठाई महाग असल्याने दरदिवशी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे घरीच तयार केलेले पक्वान्न नैवेद्य म्हणून ठेवतो. स्थापना आणि विसर्जन करताना पेढ्याचे मोदक नामांकित हॉटेलमधून खरेदी करतो. सध्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.

मीनल श्रीवास्तव, गृहिणी

दरांवर नियंत्रण कोणाचे?

भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न प्रशासन विभागाला आहेत. कारवाईदरम्यान अनेकदा दंडही वसूल करण्यात येतो. कच्च्या मालाच्या दरानुसार तयार मिठाई वा खाद्यपदार्थांची कोणत्या भावात विक्री करावी, ते अधिकार विक्रेत्यांना आहेत.

जयंत वाणे, सहआयुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग