शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

नागपूर : गणेशोत्सवात मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढतात, असा अनुभव आहे. यंदा दूध, साखर, खोवा, काजू, रंग ...

नागपूर : गणेशोत्सवात मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढतात, असा अनुभव आहे. यंदा दूध, साखर, खोवा, काजू, रंग या कच्च्या मालाच्या दरात फारशी वाढ न होताही विक्रेत्यांनी दर वाढविले आहेत. त्याचा फटका गरीब आणि सर्वसामान्यांना बसत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव कोरोना नियमांतर्गत साजरा करण्यात येत असतानाही प्रत्येक घरी दरदिवशी पाव, अर्धा वा किलो मोदक पेढे व अन्य मिठाई खरेदी केली जाते. त्याचा फायदा विक्रेते घेतात. दरवाढीवर नियंत्रण कुणाचे आणि किती विक्रेत्यांवर भेसळीची कारवाई होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एफडीए कायद्यानुसार विक्रेत्याला मिठाईच्या ट्रेवर ‘बेस्ट बिफोर’ अर्थात मिठाईचे उत्पादन आणि एक्स्पायरी तारीख लिहावी लागते. काही विक्रेत्यांकडे मिठाईवर तारखेचा उल्लेख नसतोच. अशा विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने विक्रेते तारीख गेल्यानंतरची मिठाईची विक्री करतात. त्या ग्राहकांची फसवणूक होते. अशा विक्रेत्यांवर भेसळ कायद्यांतर्गत कारवाई करून दंड वसूल करावा आणि दुकाने सील करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे.

मिठाईचे दर (प्रति किलो)

मिठाईसध्याचा दर गणेशोत्सवाआधी

पेढे ५८० ५२०

बर्फी ६०० ५४०

गुलाबजामून १२० १००

काजू कतली ७४० ७००

मोतीचूर लाडू २८० २४०

का दर वाढले?

नंदनवन भागातील स्वीट मार्ट चालक म्हणाले, खोवा, दूध, काजूचे दर, कारागिरी आणि विजेचे दर वाढल्यामुळेच मिठाईची दरवाढ झाली आहे. मिठाई नेहमीच थंड जागेत ठेवावी लागते. दूध आणि खोव्याची मिठाई जास्त दिवस टिकत नाही. थोडाफार नफा घेऊन मिठाईची विक्री करतो.

वर्धा रोडवरील हॉटेलचालक म्हणाले, कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरच दरवाढ करतो. सध्या दुधासह सर्वच कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. कारागिरी दुप्पट झाली आहे. नफा मिळत असेल तरच मिठाईची विक्री करण्यात अर्थ आहे. गणेशोत्सवात पेढ्याला, मोदकला मागणी असते.

भेसळीकडे लक्ष असू द्या :

धार्मिक उत्सवात लोकांचा मिठाई खरेदीकडे जास्त कल असतो. काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. ग्राहकही खरेदी करताना जागरूकतेने लक्ष देत नसल्याने विक्रेत्यांचे फावते. अन्न प्रशासन विभागाकडे पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे शहरात बहुतांश परिसरात कारवाई होत नाही. त्यामुळे लोकांनीच भेसळीकडे जागरूकतेने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्राहक म्हणतात :

उत्सवात लोकांनी मिठाई जागरूकतेने खरेदी करावी. गणेशाला नैवेद्यासाठी पेढ्याचे मोदक खरेदी करावे लागतात. मिठाई नेहमीच्या हॉटेलमधून खरेदी करतो. त्यामुळे भेसळीचा प्रश्नच येत नाही. पण खरेदीवेळी लोकांनी दक्ष असावे.

महेंद्र आदमने, ग्राहक

मिठाई महाग असल्याने दरदिवशी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे घरीच तयार केलेले पक्वान्न नैवेद्य म्हणून ठेवतो. स्थापना आणि विसर्जन करताना पेढ्याचे मोदक नामांकित हॉटेलमधून खरेदी करतो. सध्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.

मीनल श्रीवास्तव, गृहिणी

दरांवर नियंत्रण कोणाचे?

भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न प्रशासन विभागाला आहेत. कारवाईदरम्यान अनेकदा दंडही वसूल करण्यात येतो. कच्च्या मालाच्या दरानुसार तयार मिठाई वा खाद्यपदार्थांची कोणत्या भावात विक्री करावी, ते अधिकार विक्रेत्यांना आहेत.

जयंत वाणे, सहआयुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग