शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

 नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:02 IST

महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देदर १५ मिनिटात फेरी : अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जॉय राईड करण्यात आली. रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज येथून निघाल्यानंतर काही वेळ वेग कमी होता, नंतर वेग वाढून ट्रॅकवर वेगात धावली.अजनी मेट्रो स्टेशन ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनपर्यंत वळण मार्ग असल्यामुळे वेग कमी झाला होता. पण वर्धा रोडवर पोहोचल्यानंतर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपर्यंत रेल्वेचा वेग सरासरी प्रति तास ६५ ते ७० होता. या प्रकारे सीताबर्डी ते जयप्रकाशनगरपर्यंतचा प्रवास केवळ ११ ते १२ मिनिटात पूर्ण केला. प्रवासानंतर पत्रकारांनी जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि सुविधांची पाहणी केली.मेट्रो हाऊसमध्ये पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वे प्रति तास ८० च्या वेगाने धावत आहे. याकरिता अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब केला आहे. यामुळे काही जागा वगळता उर्वरित ठिकाणांवर सिंग्नल लावावे लागले नाहीत. सेक्शनमध्ये रेल्वेला थांबविण्याची गरज नाही. अपघाताची शक्यता नाही.या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासीमार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वेत प्रवासाचा लोकांचा कल वाढत आहे. दीक्षित म्हणाले, शनिवार आणि रविवारला १२ हजार आणि आठवड्यात सरासरी दररोज चार हजार लोक प्रवास करीत आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे.फीडर बससेवा १३ मार्गावर निश्चितमेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी फीडर बससेवेचे १३ मार्ग ठरले आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनकरिता फीडर बससेवा म्हाळगीनगर ते हिंगणापर्यंतच्या मार्गावर चालविण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे मेट्रो स्टेशनलगतच्या भागासाठी ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सरकार बदलण्याचा प्रकल्पावर परिणाम नाहीदीक्षित म्हणाले, लोकशाहीत निवडणुका होतात. सरकार बदलतात. अशास्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलण्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. हिंगणा-सीताबर्डी मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर