शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

 नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:02 IST

महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देदर १५ मिनिटात फेरी : अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जॉय राईड करण्यात आली. रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज येथून निघाल्यानंतर काही वेळ वेग कमी होता, नंतर वेग वाढून ट्रॅकवर वेगात धावली.अजनी मेट्रो स्टेशन ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनपर्यंत वळण मार्ग असल्यामुळे वेग कमी झाला होता. पण वर्धा रोडवर पोहोचल्यानंतर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपर्यंत रेल्वेचा वेग सरासरी प्रति तास ६५ ते ७० होता. या प्रकारे सीताबर्डी ते जयप्रकाशनगरपर्यंतचा प्रवास केवळ ११ ते १२ मिनिटात पूर्ण केला. प्रवासानंतर पत्रकारांनी जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि सुविधांची पाहणी केली.मेट्रो हाऊसमध्ये पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वे प्रति तास ८० च्या वेगाने धावत आहे. याकरिता अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब केला आहे. यामुळे काही जागा वगळता उर्वरित ठिकाणांवर सिंग्नल लावावे लागले नाहीत. सेक्शनमध्ये रेल्वेला थांबविण्याची गरज नाही. अपघाताची शक्यता नाही.या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासीमार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वेत प्रवासाचा लोकांचा कल वाढत आहे. दीक्षित म्हणाले, शनिवार आणि रविवारला १२ हजार आणि आठवड्यात सरासरी दररोज चार हजार लोक प्रवास करीत आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे.फीडर बससेवा १३ मार्गावर निश्चितमेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी फीडर बससेवेचे १३ मार्ग ठरले आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनकरिता फीडर बससेवा म्हाळगीनगर ते हिंगणापर्यंतच्या मार्गावर चालविण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे मेट्रो स्टेशनलगतच्या भागासाठी ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सरकार बदलण्याचा प्रकल्पावर परिणाम नाहीदीक्षित म्हणाले, लोकशाहीत निवडणुका होतात. सरकार बदलतात. अशास्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलण्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. हिंगणा-सीताबर्डी मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर