शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

 नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:02 IST

महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देदर १५ मिनिटात फेरी : अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जॉय राईड करण्यात आली. रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज येथून निघाल्यानंतर काही वेळ वेग कमी होता, नंतर वेग वाढून ट्रॅकवर वेगात धावली.अजनी मेट्रो स्टेशन ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनपर्यंत वळण मार्ग असल्यामुळे वेग कमी झाला होता. पण वर्धा रोडवर पोहोचल्यानंतर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपर्यंत रेल्वेचा वेग सरासरी प्रति तास ६५ ते ७० होता. या प्रकारे सीताबर्डी ते जयप्रकाशनगरपर्यंतचा प्रवास केवळ ११ ते १२ मिनिटात पूर्ण केला. प्रवासानंतर पत्रकारांनी जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि सुविधांची पाहणी केली.मेट्रो हाऊसमध्ये पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वे प्रति तास ८० च्या वेगाने धावत आहे. याकरिता अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब केला आहे. यामुळे काही जागा वगळता उर्वरित ठिकाणांवर सिंग्नल लावावे लागले नाहीत. सेक्शनमध्ये रेल्वेला थांबविण्याची गरज नाही. अपघाताची शक्यता नाही.या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासीमार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वेत प्रवासाचा लोकांचा कल वाढत आहे. दीक्षित म्हणाले, शनिवार आणि रविवारला १२ हजार आणि आठवड्यात सरासरी दररोज चार हजार लोक प्रवास करीत आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे.फीडर बससेवा १३ मार्गावर निश्चितमेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी फीडर बससेवेचे १३ मार्ग ठरले आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनकरिता फीडर बससेवा म्हाळगीनगर ते हिंगणापर्यंतच्या मार्गावर चालविण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे मेट्रो स्टेशनलगतच्या भागासाठी ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सरकार बदलण्याचा प्रकल्पावर परिणाम नाहीदीक्षित म्हणाले, लोकशाहीत निवडणुका होतात. सरकार बदलतात. अशास्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलण्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. हिंगणा-सीताबर्डी मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर