शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उत्तम आरोग्य आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार मेट्रो रेल्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:18 IST

मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.

ठळक मुद्दे मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रो आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन समारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी दीक्षित बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेषज्ञांनी मत मांडले आणि मेट्रोचे फायदे सांगितले. उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, समाजसेवक दिनेश नायडू, महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ६० टक्के काम तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. रेल्वे जमिनीवरून व्यावसायिकरीत्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रकल्पात केवळ २७ महिन्यात ट्रायल रन करून देशातील मेट्रो रेल्वेत इतिहास रचला आहे. पहिल्या टप्प्यात दररोज ३.५० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांसह एकूण ५.५० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. त्यांना फीडर सेवेने जोडले जाईल.दुसºया सत्रात मेट्रो रेल्वेचे फायदे, या विषयावर समूह चर्चा झाली. चर्चेत महापौर नंदा जिचकार, वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रशांत जगताप, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वरिष्ठ पत्रकार आलोक तिवारी, आर्किटेक्ट अवंतिका चिटणवीस उपस्थित होते. जिचकार यांनी रस्त्यांवरील अपघात कमी होऊन पर्यावरणाची सुरक्षा होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होईल. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना पायदळ चालावे लागेल. त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब, तणाव, हृदयविकार, मधुमेह यासारख्या व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. आलोक तिवारी यांनी वेगवान प्रकल्पाची प्रशंसा केली. प्रकल्प व्यावहारिक बनावा. डॉ. सतीश वटे यांनी प्रकल्पामुळे वायू प्रदूषण कमी होईल, असे सांगितले. डॉ. अतुल पांडे यांनी प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मांडले. अवंतिका चिटणवीस यांनी मेट्रो प्रकल्पात लोकांना जोडण्याचे आवाहन केले. संचालन योगेश देशपांडे आणि आभार महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी मानले.यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर