शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उत्तम आरोग्य आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार मेट्रो रेल्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:18 IST

मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.

ठळक मुद्दे मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रो आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन समारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी दीक्षित बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेषज्ञांनी मत मांडले आणि मेट्रोचे फायदे सांगितले. उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, समाजसेवक दिनेश नायडू, महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ६० टक्के काम तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. रेल्वे जमिनीवरून व्यावसायिकरीत्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रकल्पात केवळ २७ महिन्यात ट्रायल रन करून देशातील मेट्रो रेल्वेत इतिहास रचला आहे. पहिल्या टप्प्यात दररोज ३.५० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांसह एकूण ५.५० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. त्यांना फीडर सेवेने जोडले जाईल.दुसºया सत्रात मेट्रो रेल्वेचे फायदे, या विषयावर समूह चर्चा झाली. चर्चेत महापौर नंदा जिचकार, वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रशांत जगताप, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वरिष्ठ पत्रकार आलोक तिवारी, आर्किटेक्ट अवंतिका चिटणवीस उपस्थित होते. जिचकार यांनी रस्त्यांवरील अपघात कमी होऊन पर्यावरणाची सुरक्षा होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होईल. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना पायदळ चालावे लागेल. त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब, तणाव, हृदयविकार, मधुमेह यासारख्या व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. आलोक तिवारी यांनी वेगवान प्रकल्पाची प्रशंसा केली. प्रकल्प व्यावहारिक बनावा. डॉ. सतीश वटे यांनी प्रकल्पामुळे वायू प्रदूषण कमी होईल, असे सांगितले. डॉ. अतुल पांडे यांनी प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मांडले. अवंतिका चिटणवीस यांनी मेट्रो प्रकल्पात लोकांना जोडण्याचे आवाहन केले. संचालन योगेश देशपांडे आणि आभार महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी मानले.यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर