शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

उत्तम आरोग्य आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार मेट्रो रेल्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:18 IST

मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.

ठळक मुद्दे मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रो आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन समारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी दीक्षित बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेषज्ञांनी मत मांडले आणि मेट्रोचे फायदे सांगितले. उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, समाजसेवक दिनेश नायडू, महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ६० टक्के काम तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. रेल्वे जमिनीवरून व्यावसायिकरीत्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रकल्पात केवळ २७ महिन्यात ट्रायल रन करून देशातील मेट्रो रेल्वेत इतिहास रचला आहे. पहिल्या टप्प्यात दररोज ३.५० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांसह एकूण ५.५० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. त्यांना फीडर सेवेने जोडले जाईल.दुसºया सत्रात मेट्रो रेल्वेचे फायदे, या विषयावर समूह चर्चा झाली. चर्चेत महापौर नंदा जिचकार, वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रशांत जगताप, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वरिष्ठ पत्रकार आलोक तिवारी, आर्किटेक्ट अवंतिका चिटणवीस उपस्थित होते. जिचकार यांनी रस्त्यांवरील अपघात कमी होऊन पर्यावरणाची सुरक्षा होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होईल. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना पायदळ चालावे लागेल. त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब, तणाव, हृदयविकार, मधुमेह यासारख्या व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. आलोक तिवारी यांनी वेगवान प्रकल्पाची प्रशंसा केली. प्रकल्प व्यावहारिक बनावा. डॉ. सतीश वटे यांनी प्रकल्पामुळे वायू प्रदूषण कमी होईल, असे सांगितले. डॉ. अतुल पांडे यांनी प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मांडले. अवंतिका चिटणवीस यांनी मेट्रो प्रकल्पात लोकांना जोडण्याचे आवाहन केले. संचालन योगेश देशपांडे आणि आभार महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी मानले.यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर