शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यात पारा २ अंशाने वाढणार; नागपुरात सायंकाळी ढगांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 19:18 IST

Nagpur News विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देवैदर्भीयांचा त्रास वाढला

नागपूर : यावेळी सुरुवातीपासून तापणारा उन्हाळा पुढे सरकताना अधिकच तापदायक ठरत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नागपूरसह विदर्भात उष्णता व सूर्याच्या प्रकाेपापासून दिलासा मिळताना दिसत नाही. मध्ये दाेन दिवस नागपूर व काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते, पण ताप कमी झाला नाही. आता पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. गुरुवारी नागपुरात कमाल तापमान ४१ अंशाच्या आसपास पाेहोचले. हवामान विभागाने विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. त्यानुसार दुपारी ४ नंतर सूर्य काही अंशी ढगांनी झाकला हाेता, पण उष्णतेत कमतरता नव्हती. काेकणात तुरळक पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज हाेता. राजस्थानच्या आसपास वेस्टर्न डिर्स्टबन्स व मध्य महाराष्ट्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशनच्या प्रभावाने वातावरणात बदल झाला आहे.

विदर्भात ४१.६ अंशासह अकाेला, ४१.४ अंशासह अमरावती, ४१.५ अंशासह ब्रम्हपुरी व ४१ अंशासह चंद्रपूर सर्वाधिक तापलेले हाेते. वर्धा व यवतमाळमध्ये ४०.५ अंशाची नाेंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशाने अधिक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत ढगाळ वातावरणामुळे घसरलेला पारा पुन्हा वाढला. मराठवाड्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस राज्यातील सर्व भागात तापमान पुन्हा २ अंशाने वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यानंतर ते स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्यातरी सूर्याच्या प्रकाेपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

टॅग्स :weatherहवामान