शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

नागपूरसह विदर्भात पारा घसरला; काही दिवसातच भरणार हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:53 IST

Nagpur News नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हिवाळ्याने आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे.

नागपूर : नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हिवाळ्याने आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. रविवारी नागपुरात रात्रीचा पारा २ अंशांनी खाली घसरून १३ अंशांवर पाेहोचला. त्यामुळे थंडीची तीव्र जाणीव व्हायला लागली आहे. दिवसाचे तापमान मात्र ३० अंशांवर कायम आहे.

२४ तासांत किमान तापमान १५ अंशांवरून १३ अंशांवर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी कमी आहे. नागपूर आणि यवतमाळ सर्वात थंड शहर ठरले. नाेव्हेंबर महिन्यात नागपुरात सरासरी १५.८ अंश तापमानाची नाेंद हाेते. १९१२ साली ताे ६.७ अंशांपर्यंत खाली गेला हाेता. नाेव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान दिवसागणिक घसरत जाते. मात्र, १५ अंशांपर्यंत मर्यादीत असते. यावेळी दुसऱ्याच आठवड्यात ते १३ अंशांवर घसरले आहे.

हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, जम्मू-काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेशात एकाच वेळी पाऊस आणि बर्फवृष्टीचे वातावरण असल्याने, त्याचा प्रभाव उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात दिसत आहे. रात्रीचा पारा २ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अकाेला (१७), वाशिम (१७) व चंद्रपूर (१६.४) वगळता, इतर जिल्ह्यांत तापमान १५ व त्याच्या खाली घसरले आहे. नागपूरनंतर गाेंदिया (१३.६), वर्धा (१४.४) व अमरावती येथे १४.८ अंशांसह थंड शहरे हाेती. चंद्रपुरात सकाळी ६६ टक्के नाेंदविलेली आर्द्रता सायंकाळी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली. नागपुरात ६२, वर्धा ४२, अकाेला ४९, अमरावती ५५, तर गडचिराेली ५१ टक्के आर्द्रता नाेंदविण्यात आली. पारा घसरल्याने दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) ४ ते १० किलाेमीटरवर आली आहे. पुढच्या काही दिवसांत वातावरण असेच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामान