शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यातील व्यापारी संतप्त : मतमोजणीमुळे बाजारात छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:40 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे२१ ते २४ मेपर्यंत बाजारपेठा पूर्णत: बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या या बाजाराऐवजी प्रशासनाने मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये मतमोजणी करावी, अशी मागणी व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना केली.चार दिवस बाजार बंदमतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणाने बाजार समितीला पत्र पाठवून चार दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बाजार समितीने सर्व बाजाराच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून २१ मेच्या दुपारी ४ वाजेपासून २४ मेपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, अडतिये आणि ग्राहकांना बाजारात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बाजारात चार दिवसांत मालाची आवक बंद राहील. त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय होणार नाही.भाज्यांची आवक बंद राहणारकळमन्यात सहा मोठ्या बाजारपेठा आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाज्यांचा पुरवठा करणारा भाजीबाजार बंद राहिल्यामुळे शहरात भाज्यांचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच आंब्याच्या सीझनमध्ये बाजारात माल येणार नाही; शिवाय कांदे-बटाटे, लसूण, अद्रक आदींची आवकही होणार नाही. त्यामुळे चार दिवस ग्राहकांना या शेतकी मालापासून वंचित राहावे लागेल. तसेच धान्यबाजारही बंद राहणार असल्यामुळे शेतकरी धान्य आणणार नाही. त्यामुळे दररोज होणाऱ्या मालाचे लिलाव बंद राहतील. तपत्या उन्हामुळे अडतिये आणि व्यापाऱ्यांना बाजारात उपलब्ध फळांचा स्टॉक कमी भावात विकावा लागणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.मतमोजणी कळमन्यात करू नयेलोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात करू नये, याकरिता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध बाजारपेठांमधील पदाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र लिहिले होते. मतमोजणी मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी केली केली होती. पण शासनाने दुर्लक्ष केले. गेल्या मतमोजणीच्या वेळी बाजार दोन दिवस बंद होता, पण यंदा चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे.आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,कळमना फळे बाजार अडतिया असोसिएशन.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpurनागपूर