शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मशताब्दी साजरी होतेय की स्मृतीवर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:04 IST

आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे.

ठळक मुद्देडागांचा मनपाला विसर : मूर्तीवर धूळ साचली; परिसरही अस्वच्छ

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, त्यांच्या स्मृती वर्षालाच मनपाने जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्याची तयारी सुरू केली आहे. डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष अविस्मरणीय राहील अशा स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा दावा महापालिका करीत आहे. डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ तर मृत्यू २० जानेवारी १९१७ ला झाला होता. इकडे कस्तूरचंद पार्क येथील त्यांच्या पुतळ्याकडे मात्र दुर्लक्ष आहे.कस्तूरचंद पार्कच्या भाड्यातून महसूल विभागाला वर्षाला लाखों रुपयांचा महसूल मिळतो. परंतु डागा यांच्या मूर्तीचे सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडे पैसा नाही. एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत डागा यांचा पुतळा फूटपाथवर ठेवण्यात आला आहे. पुतळ्याची सुरक्षा व देखभाल करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. माजी महापौर राजेश तांबे यांनी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी १९९६ मध्ये तत्कालीन महापौर राजेश तांबे यांची भेट घेऊ न मूर्ती परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. त्यानंतर डागा यांच्या मूर्तीकडे कुणाचेही लक्ष नाही.असे असूनही महापालिका डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष धूमधडाक्यात साजरे करणार असल्याचा दावा करीत असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.‘लोकमत’शी चर्चा करताना नागरिकांना महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. डागा यांची नवीन पिढीला ओळख व्हावी. यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मूर्तीच्या परिसराचे सौंदर्यीकरण तर दूरच मूर्ती कस्तूरचंद पार्कमध्ये बसविण्याचाही मनपाला विसर पडला आहे.कोण आहेत कस्तूरचंद डागासन १७९० मध्ये बिकानेर येथून माहेश्वरी समाजातील काही कुटुंब नागपुरात आले होते. यात अबीरचंद डागा यांचाही समावेश होता. त्यांचे पुत्र कस्तूरचंद डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ साली झाला होता. वयाच्या १५ वर्षी त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. नागपूरसह विदर्भात विपुल प्रमाणात असलेली खनिज संपत्ती व कापूस विचारात घेता त्यांनी खाणी व मिल सुरू केल्या. देशा सोबतच विदेशात मेसर्स आर.बी.बंशीलाल अबीरचंद प्रतिष्ठानच्या शाखा सुरू केल्या. विकासातील त्यांचे भरीव योगदान विचारात घेता त्यांना विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.अशी बसविली मूर्तीकस्तूरचंद डागा यांचा मृत्यू २० जानेवारी १९१७ रोजी झाला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कस्तूरचंद पार्कच्या उत्तर-पूर्व भागात त्यांची संगमरवरची मूर्ती त्यांचे मित्र माणिकचंद दादाभाई यांनी बसविली होती. यासाठी त्यांनी डागा कुटुंबीयांकडून एकही पैसा घेतला नाही. कस्तूरचंद डागा माझे घनिष्ठ मित्र होेते. त्यांच्या स्मृती मूर्ती स्वरुपात कायम राहाव्या, असे माणिकचंद दादाभाई यांचे म्हणणे होते.