शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

जन्मशताब्दी साजरी होतेय की स्मृतीवर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:04 IST

आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे.

ठळक मुद्देडागांचा मनपाला विसर : मूर्तीवर धूळ साचली; परिसरही अस्वच्छ

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, त्यांच्या स्मृती वर्षालाच मनपाने जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्याची तयारी सुरू केली आहे. डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष अविस्मरणीय राहील अशा स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा दावा महापालिका करीत आहे. डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ तर मृत्यू २० जानेवारी १९१७ ला झाला होता. इकडे कस्तूरचंद पार्क येथील त्यांच्या पुतळ्याकडे मात्र दुर्लक्ष आहे.कस्तूरचंद पार्कच्या भाड्यातून महसूल विभागाला वर्षाला लाखों रुपयांचा महसूल मिळतो. परंतु डागा यांच्या मूर्तीचे सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडे पैसा नाही. एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत डागा यांचा पुतळा फूटपाथवर ठेवण्यात आला आहे. पुतळ्याची सुरक्षा व देखभाल करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. माजी महापौर राजेश तांबे यांनी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी १९९६ मध्ये तत्कालीन महापौर राजेश तांबे यांची भेट घेऊ न मूर्ती परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. त्यानंतर डागा यांच्या मूर्तीकडे कुणाचेही लक्ष नाही.असे असूनही महापालिका डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष धूमधडाक्यात साजरे करणार असल्याचा दावा करीत असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.‘लोकमत’शी चर्चा करताना नागरिकांना महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. डागा यांची नवीन पिढीला ओळख व्हावी. यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मूर्तीच्या परिसराचे सौंदर्यीकरण तर दूरच मूर्ती कस्तूरचंद पार्कमध्ये बसविण्याचाही मनपाला विसर पडला आहे.कोण आहेत कस्तूरचंद डागासन १७९० मध्ये बिकानेर येथून माहेश्वरी समाजातील काही कुटुंब नागपुरात आले होते. यात अबीरचंद डागा यांचाही समावेश होता. त्यांचे पुत्र कस्तूरचंद डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ साली झाला होता. वयाच्या १५ वर्षी त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. नागपूरसह विदर्भात विपुल प्रमाणात असलेली खनिज संपत्ती व कापूस विचारात घेता त्यांनी खाणी व मिल सुरू केल्या. देशा सोबतच विदेशात मेसर्स आर.बी.बंशीलाल अबीरचंद प्रतिष्ठानच्या शाखा सुरू केल्या. विकासातील त्यांचे भरीव योगदान विचारात घेता त्यांना विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.अशी बसविली मूर्तीकस्तूरचंद डागा यांचा मृत्यू २० जानेवारी १९१७ रोजी झाला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कस्तूरचंद पार्कच्या उत्तर-पूर्व भागात त्यांची संगमरवरची मूर्ती त्यांचे मित्र माणिकचंद दादाभाई यांनी बसविली होती. यासाठी त्यांनी डागा कुटुंबीयांकडून एकही पैसा घेतला नाही. कस्तूरचंद डागा माझे घनिष्ठ मित्र होेते. त्यांच्या स्मृती मूर्ती स्वरुपात कायम राहाव्या, असे माणिकचंद दादाभाई यांचे म्हणणे होते.