लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय)) आणि महा मेट्रो नागपूर यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ४४ आणि क्रमांक ५३ वर मेट्रो व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात येणार आहेहा करार नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयात करण्यात आला. यावेळी एनएचएआयचे मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी राकेश प्रकाश सिंग, महामेट्रोचे कार्यकारी संचालक नरेश गुरबानी आणि आर. अरुण कुमार उपस्थित होते. या करारामुळे महा मेट्रोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आणि ५३ वर जामठा ते बुटीबोरी (एनएच -४४) आणि एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर (एनएच-५३) — या दोन महत्त्वाच्या मार्गांवर एनएचएआयIच्या 'राईट ऑफ वे' चा वापर करून उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्याची परवानगी मिळणार आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत उड्डाणपूल आणि मेट्रो व्हायाडक्टसाठी एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकत्रित संरचना उभारण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः जामठा आणि डोंगरगाव येथे प्रस्तावित असलेल्या दोन सहा लेनच्या उड्डाणपूलांसाठी मेट्रो व्हायाडक्टसोबत एकाच संरचनेचा उपयोग केला जाणार आहे. ही रचना वाहनांच्या अंडरपाससाठीही उपयुक्त ठरणार आहे.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये
- संरचनेचा वापर : एनएचएआय च्या ‘राईट ऑफ वे’चा वापर करून काम होणार
- डिझाईन मानके: भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार रचना
- सहकार्य : दोन्ही संस्था वाहतूक व्यवस्थापन, स्थलांतर व रस्त्यांचे पुनर्बांधणीमध्ये एकत्र काम करतील.
- सुरक्षा व गुणवत्ता : प्रत्येक टप्प्यावर दोन्ही यंत्रणांचे अधिकारी संयुक्त स्थळ पाहणी करतील.
कराराचे महत्त्व :हा करार नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी वाहतुकीचे सुलभीकरण, सार्वजनिक परिवहनात सुधारणा आणि जागेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो. यामुळे शहरात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीस चालना मिळेल.