शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:29 IST

अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.

ठळक मुद्देनिमंत्रित ‘तज्ज्ञ’ पोहचलेच नाहीत : शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनीच ठोकली भाषणं

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.कोराडी रोडवरील हेरिटेज लॉन येथे जाहीरनामा समितीची दोन दिवसीय बैठक सोमवारपासून आयोजित करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीचे सदस्य खा. राजीव गौडा यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून या बैठकीसाठी नितीन राऊत व अमोल देशमुख यांच्यावर ‘की पर्सन’ म्हणून जबाबदारी सोपविली होती. या पत्रानंतर चव्हाण यांनी एक पत्र जारी करीत किशोर गजभिये यांना या बैठकीसाठी समन्वयक म्हणून नेमले. जाहीरनामा समितीसमोर आपली मते मांडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलाविण्यासाठी केंद्र, राज्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना आपसात समन्वय साधायचा होता. तर शहर काँग्रेसला बैठक व भोजन व्यवस्था सांभाळायची होती. मात्र, गजभिये यांचे नाव येताच राऊत यांनी अंग काढून घेतले.गजभिये यांनी भोपाळ, मेळघाट, गडचिरोलीसह विदर्भातील सुमारे १४० प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. सर्वच जण येतील असे गजभिये सकाळपासून सांगत होते. सकाळी ११ वाजता के.राजू हे बैठकीसाठी पोहचले. त्यांच्यासोबत नितीन राऊत होते. मात्र, बैठकीसाठी फक्त चार ते पाच प्रतिनिधीच आले होते. दुपारचे १२ वाजले तरी ही संख्या फारशी वाढली नाही. हा ‘पूअर शो’ पाहून के.राजू संतापले व नाराजी व्यक्त करीत हॉटेलमध्ये निघून गेले. यावेळी राऊत व अमोल देशमुख यांनी राजू यांच्यासोबत गाडीमध्ये जाण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, दोघांनाही सोबत न घेता ते एकटेच निघून गेले. शेवटी प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे हे के.राजू यांची समजूत घालण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. तोवर हॉल भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावण्याची जबाबदारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. ठाकरे यांनी लागलीच कार्यकर्त्यांना मोबाईल केले व हॉल भरला. या घटनाक्रमानंतर नाराज झालेले के.राजू दुपारच्या सत्रासाठी परत आले. हॉल भरलेला पाहून सुखावले. आलेल्या निवडक तज्ज्ञांसह स्थानिक कार्यकर्त्यांनीही ‘तज्ज्ञ’ बनून भाषणे ठोकली. के. राजूंनीही मार्गदर्शन केले व जाहीरनामा समितीची पहिल्या दिवसाची बैठक पार पडली. यानंतर के.राजू हे पत्रकार परिषद घेणार होते, तसे निरोपही प्रसार माध्यमांना देण्यात आले होते. मात्र, आपण राहुल गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्ती असल्यामुळे पत्रकार परिषद घेणे योग्य होणार नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वाघमारे यांच्यावर ती जबाबदारी सोपवून ते रवाना झाले, असेकाँग्रेसच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आजच्या बैठकीसाठी तज्ज्ञांची जुळवाजुळव सोमवारच्या बैठकीत जाहीरनामा समितीसमोर मते मांडण्यासाठी तज्ज्ञ न पोहचल्यामुळे पोलखोल झाली. ही परिस्थिती पुन्हा आज, मंगळवारच्या बैठकीत निर्माण होऊ नये यासाठी रात्री नियोजन करण्यात आले. बाहेरून बोलाविलेल्या तज्ज्ञ प्रतिनिधींसोबतच स्थानिक तज्ज्ञांची यादी तयार करून त्यांना फोनवर निमंत्रण देण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर