शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मध्ययुगीन स्त्रीसंत साहित्यात स्त्रीमुक्ती चळवळीचे बीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:39 IST

आजच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून हिणवले जाते व यामुळे आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा कांगावा संस्कृतीरक्षकांच्या झुंडांकडून केला जातो.

ठळक मुद्देतारा भवाळकर : ‘स्त्री संतांच्या काव्यातील मुक्ती संकल्पना’वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून हिणवले जाते व यामुळे आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा कांगावा संस्कृतीरक्षकांच्या झुंडांकडून केला जातो. मात्र भारतात शेकडो वर्षापासून जातीयतेची व पुरुषी व्यवस्थेची बंधने स्त्रियांवर लादली होती, हे सत्य लपविता येत नाही. मध्ययुगीन काळातील स्त्रीसंतांनी ही बंधने झुगारण्याचे बंड केले होते. आज दिसणाºया स्त्रीमुक्ती चळवळीची बीजे स्त्रीसंतांनी आधीच पेरली आहेत, असे प्रतिपादन संत साहित्य व लोकसंस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केले.राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्टÑसंत तुकडोजी महाराज अध्यासन व स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने ‘स्त्री संतांच्या काव्यातील मुक्ती संकल्पना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी या उपस्थित होत्या. डॉ. भवाळकर यांनी सांगितले, संत सर्व जाती, धर्माचे होते. एकूणच स्त्री-पुरुष संतांनी स्त्रीमुक्ती नाही तर संपूर्ण मुक्तीचा विचार दिला. या संत साहित्यामुळेच शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा मिळाल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या विस्तृत अशा भाषणात त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या स्त्रीसंतांचा उल्लेख आणि त्यांच्या लेखनाची उदाहरणे दिली. महाराष्टÑातील जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, काश्मिरातून शैव परंपरेतील लल्लेश्वरी, उत्तरेतील मीराबाई, रंगनायिका, कान्होपात्रा, दक्षिण भारतातील अक्कमादेवी अशा अनेक स्त्रीसंतांनी त्यांच्या कालखंडात समाजव्यवस्थेविरुद्ध बंड केले.पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांची होणारी कुचंबणा स्त्रीसंतांच्या साहित्यात दिसते. संतांनाही त्या काळात जातीयता व आर्थिक विषमतेची बंधन सहन करावी लागली. स्त्रियांना तर मंदिर प्रवेशच नाकारण्यासह अनेक प्रकारची बंधने होती. या बंधनाचे समर्थन करण्यासाठी स्त्रीसंतांच्या जीवनाच्या दंतकथाही रचल्या गेल्याचे डॉ. भवाळकर यांनी सांगितले. स्त्रीला उपभोगाची वस्तू मानल्या जाणाºया समाजात कायम तिच्या चारित्र्याचा मुद्दा उपस्थित करून दडपल्या जात होते.मात्र स्त्रीसंतांचे आयुष्य व त्यांचे साहित्य अभ्यासल्यास त्यांनी लैंगिक आक्षेपच झुगारल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. भवाळकर यांनी ओवी, अभंगातून स्पष्ट केले. स्त्रीसंतांनी नर-नारी हे द्वंद नाकारून देहाच्या पलिकडे गेलेल्या परमेश्वराचा स्वीकार केला. जातीयता व सरंजामशाहीची उतरण आजही कायम आहे. पुरुषप्रधान व्यवस्था व धार्मिक बंधने टिकून रहावी म्हणून त्या काळात दंतकथा रचल्या गेल्या व आजही तसे प्रयत्न केले जात आहेत.संतांच्या शिकवणीनंतरही आणि आपल्याला समजल्यानंतरही समाज व स्त्रिया या बंधनात व दडपणात रेंगाळत असून त्यांना ही सरंजामशाही आवडते हीच मोठी शोकांतिका असल्याची खंत डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली.यावेळी बोलताना डॉ. रूपाताई बोधी यांनी मध्ययुगीन संतांच्या अगोदर बौद्ध धम्मातील ‘थेर गाथा’मधून आणि जैन धर्मातील साध्वी अभिव्यक्त झाल्याचे स्पष्ट केले. बुद्धाच्या समकालीन स्त्रिया मुक्त वातावरणात होत्या व त्यांच्या साहित्यातून हे दिसून येते. त्यानंतर मात्र जातीय उतरंड व बंधने लादली गेली. आज तर बलात्कार, विनयभंग व अत्याचाराच्या गर्दीत स्त्री स्वातंत्र्य हरविल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केली. संचालन उषा निनावे यांनी केले. मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी आभार मानले.