शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मध्यस्थता न्यायव्यवस्थेसाठी एक वरदान : हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:30 IST

न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘मध्यस्थता’ यावर विभागीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.पाटील यांनी न्यायालयात प्रलंबित खटल्यावर चिंता व्यक्त केली. न्यायाधीशांनी डायसवर वेळेवर यावे, न्यायदान करताना उशीर करू नये, अनावश्यक सुट्या घेऊ नये आणि नियमित सुनावणी करून खटला निकाली काढण्यावर भर द्यावा. वकील आणि पक्षकारांनीही आपसी तडजोडीने वाद निकाली काढण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थता देखरेख समिती मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थता विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन शनिवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. 

व्यासपीठावर न्यायाधीश ए.एस. ओक, न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश आर.व्ही. मोरे आणि न्यायाधीश आर.के. देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे, अतुल चांदूरकर आणि रोहित देव हजर होते.नरेश पाटील म्हणाले, शहरांमध्ये मध्यस्थतेच्या माध्यमातून खटल्याचा निपटारा करण्याचे प्रमाण वाढले आहे तर ग्रामीण भागात पक्षकारांना याकडे वळविण्यास अडचणी येत आहेत. मध्यस्थतेच्या माध्यमातून आपसी तडजोड केल्यास दोन्ही पक्षांना दिलासा मिळतो. त्याकरिता सर्वांनी एकत्रितरीत्या मध्यस्थतेवर पक्षकारांना वारंवार सांगितले पाहिजे. त्यांना आपसी तडजोड करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. या कार्यात न्यायिक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश आर.के. देशपांडे यांनी परिषदेत विषयाची माहिती दिली. परिषदेच्या उद्घाटनानंतर तीन वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.पहिल्या सत्रात न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश आणि रिसोर्स पर्सन तनू मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात न्यायाधीश भूषण गवई व वरिष्ठ वकील राजीव पाटील यांनी मध्यस्थतेने खटला निकाली काढण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उद्घाटन समारंभात संपूर्ण विदर्भातील जिल्हा सत्र न्यायालयाचे ५०१ न्यायाधीश आणि ५० वरिष्ठ वकील उपस्थित होते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर