शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मध्यस्थता न्यायव्यवस्थेसाठी एक वरदान : हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:30 IST

न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘मध्यस्थता’ यावर विभागीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.पाटील यांनी न्यायालयात प्रलंबित खटल्यावर चिंता व्यक्त केली. न्यायाधीशांनी डायसवर वेळेवर यावे, न्यायदान करताना उशीर करू नये, अनावश्यक सुट्या घेऊ नये आणि नियमित सुनावणी करून खटला निकाली काढण्यावर भर द्यावा. वकील आणि पक्षकारांनीही आपसी तडजोडीने वाद निकाली काढण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थता देखरेख समिती मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थता विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन शनिवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. 

व्यासपीठावर न्यायाधीश ए.एस. ओक, न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश आर.व्ही. मोरे आणि न्यायाधीश आर.के. देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे, अतुल चांदूरकर आणि रोहित देव हजर होते.नरेश पाटील म्हणाले, शहरांमध्ये मध्यस्थतेच्या माध्यमातून खटल्याचा निपटारा करण्याचे प्रमाण वाढले आहे तर ग्रामीण भागात पक्षकारांना याकडे वळविण्यास अडचणी येत आहेत. मध्यस्थतेच्या माध्यमातून आपसी तडजोड केल्यास दोन्ही पक्षांना दिलासा मिळतो. त्याकरिता सर्वांनी एकत्रितरीत्या मध्यस्थतेवर पक्षकारांना वारंवार सांगितले पाहिजे. त्यांना आपसी तडजोड करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. या कार्यात न्यायिक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश आर.के. देशपांडे यांनी परिषदेत विषयाची माहिती दिली. परिषदेच्या उद्घाटनानंतर तीन वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.पहिल्या सत्रात न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश आणि रिसोर्स पर्सन तनू मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात न्यायाधीश भूषण गवई व वरिष्ठ वकील राजीव पाटील यांनी मध्यस्थतेने खटला निकाली काढण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उद्घाटन समारंभात संपूर्ण विदर्भातील जिल्हा सत्र न्यायालयाचे ५०१ न्यायाधीश आणि ५० वरिष्ठ वकील उपस्थित होते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर