शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 10:44 IST

राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.

ठळक मुद्देमे महिन्यात लागला होता ‘सीईटी’चा निकाल

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सीईटी सेलने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे निकाल जाहीर होतील, असा अंदाज सेलला आहे. वास्तवात विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षांचे निकाल ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे, ऑक्टोबरच्या दुसºया आठवड्यात प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होणे अद्याप तरी अशक्य आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उशीर होत असल्याच्या स्थितीत विद्यार्थी मुक्त विद्यापीठाकडे वळण्याच्या शक्यतेने तोटा होण्याची भीती महाविद्यालयांना आहे. त्यातच अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा दबाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.दोन सत्रांचा सामना एकसाथ करावा लागेल: प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने, दोन सत्रांच्या परीक्षा एकसाथ देण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यापीठांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. परंतु, यंदा प्रथम सत्राच्या परीक्षा मार्च पर्यंत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच दुसºया सत्राच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.४५०० सीट्स: नागपूर विभागात एमबीएच्या ४५०० जागा आहेत. मार्च महिन्यामध्ये झालेल्या सीईटीमध्ये विभागातून १६ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे, यंदा प्रवेशांची संख्या उत्तम राहण्याचा अंदाज महाविद्यालयांना होता. परंतु, टाळेबंदी आणि आता परीक्षांच्या आयोजनात होत असलेला उशीर, यामुळे या जागा भरण्याची शक्यता कमीच आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र