शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 10:44 IST

राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.

ठळक मुद्देमे महिन्यात लागला होता ‘सीईटी’चा निकाल

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सीईटी सेलने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे निकाल जाहीर होतील, असा अंदाज सेलला आहे. वास्तवात विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षांचे निकाल ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे, ऑक्टोबरच्या दुसºया आठवड्यात प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होणे अद्याप तरी अशक्य आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उशीर होत असल्याच्या स्थितीत विद्यार्थी मुक्त विद्यापीठाकडे वळण्याच्या शक्यतेने तोटा होण्याची भीती महाविद्यालयांना आहे. त्यातच अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा दबाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.दोन सत्रांचा सामना एकसाथ करावा लागेल: प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने, दोन सत्रांच्या परीक्षा एकसाथ देण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यापीठांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. परंतु, यंदा प्रथम सत्राच्या परीक्षा मार्च पर्यंत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच दुसºया सत्राच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.४५०० सीट्स: नागपूर विभागात एमबीएच्या ४५०० जागा आहेत. मार्च महिन्यामध्ये झालेल्या सीईटीमध्ये विभागातून १६ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे, यंदा प्रवेशांची संख्या उत्तम राहण्याचा अंदाज महाविद्यालयांना होता. परंतु, टाळेबंदी आणि आता परीक्षांच्या आयोजनात होत असलेला उशीर, यामुळे या जागा भरण्याची शक्यता कमीच आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र