शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या आदेशाला राज्य सरकारकडे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:57 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. यासोबतच महापौर व आयुक्तातील वाद आता राज्य सरकारच्या दरबारात पोहचला आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे व महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले होते. अद्यापही हा संघर्ष सुरूच आहे.सभागृहातील आदेशानुसार ६ जुलैपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळाली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करून तीन दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, असे निर्देश संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले होते. मात्र, आयुक्तांनी आदेशानुसार याबाबतचा अहवाल सादर न करता महापौरांचे आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा २६ जून रोजी घेण्यात आली. या वादळी सभेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला होता. पालिकेची ही सभा संपूर्ण राज्यभरात गाजली. सभेत महापौर जोशी यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले होते.६ जुलैपर्यंत निर्देशांवरील कारवाईचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासाठी सांगितले होते. महापौरांनी एलईडी पथदिव्यांची नस्ती १३५ दिवस लेखा व वित्त विभाग अधिकाऱ्यांनी स्वत:जवळ ठेवल्याबाबत त्यांच्या मूळ विभागाला डिसिप्लीन कार्यवाही करण्याची शिफारस करणे, डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबत त्यांचे तात्काळ निलंबन करून स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समितीने त्यांची चौकशी करणे. शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे, या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे याबाबत आयुक्तांनी आपले स्पष्टीकरण सादर करावे. नियमानुसार स्थायी समितीच्या अनुमतीने राज्य शासनाकडुन आयुक्त, अति.आयुक्त यांनी सुट्यांची मंजुरी घेणे अपेक्षित असताना रजेबाबत स्थायी समितीची परवानगी घेतली नाही, याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करावे. सर्व निर्देशावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासनाने महापौरांचे आदेश विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.अधिकार राज्य शासनालासन २०११ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९, कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या कलमानुसार विविक्षित प्रकरणात महापालिकेचा किंवा इतर प्राधिकाऱ्याचा कोणताही ठराव किंवा आदेश शांतता भंग करत असेल, लोकांना किंवा व्यक्तीच्या कोणत्याही वर्गाला हानी वा त्रास होण्याचा धोका आहे किंवा महापालिकेस आर्थिक हानी पोहचत असेल तर आदेश निलंबित किंवा विखंडित करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. मात्र महापौरांच्या आदेशामुळे कोणती हानी पोहचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेState Governmentराज्य सरकार