शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महापौरांच्या आदेशाला राज्य सरकारकडे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:57 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. यासोबतच महापौर व आयुक्तातील वाद आता राज्य सरकारच्या दरबारात पोहचला आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे व महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले होते. अद्यापही हा संघर्ष सुरूच आहे.सभागृहातील आदेशानुसार ६ जुलैपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळाली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करून तीन दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, असे निर्देश संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले होते. मात्र, आयुक्तांनी आदेशानुसार याबाबतचा अहवाल सादर न करता महापौरांचे आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा २६ जून रोजी घेण्यात आली. या वादळी सभेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला होता. पालिकेची ही सभा संपूर्ण राज्यभरात गाजली. सभेत महापौर जोशी यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले होते.६ जुलैपर्यंत निर्देशांवरील कारवाईचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासाठी सांगितले होते. महापौरांनी एलईडी पथदिव्यांची नस्ती १३५ दिवस लेखा व वित्त विभाग अधिकाऱ्यांनी स्वत:जवळ ठेवल्याबाबत त्यांच्या मूळ विभागाला डिसिप्लीन कार्यवाही करण्याची शिफारस करणे, डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबत त्यांचे तात्काळ निलंबन करून स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समितीने त्यांची चौकशी करणे. शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे, या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे याबाबत आयुक्तांनी आपले स्पष्टीकरण सादर करावे. नियमानुसार स्थायी समितीच्या अनुमतीने राज्य शासनाकडुन आयुक्त, अति.आयुक्त यांनी सुट्यांची मंजुरी घेणे अपेक्षित असताना रजेबाबत स्थायी समितीची परवानगी घेतली नाही, याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करावे. सर्व निर्देशावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासनाने महापौरांचे आदेश विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.अधिकार राज्य शासनालासन २०११ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९, कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या कलमानुसार विविक्षित प्रकरणात महापालिकेचा किंवा इतर प्राधिकाऱ्याचा कोणताही ठराव किंवा आदेश शांतता भंग करत असेल, लोकांना किंवा व्यक्तीच्या कोणत्याही वर्गाला हानी वा त्रास होण्याचा धोका आहे किंवा महापालिकेस आर्थिक हानी पोहचत असेल तर आदेश निलंबित किंवा विखंडित करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. मात्र महापौरांच्या आदेशामुळे कोणती हानी पोहचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेState Governmentराज्य सरकार